AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 9 व्या वर्षी सोडले घर, 19 व्या वर्षी क्रांतिकारी सन्यासी, स्वातंत्र्यसंग्रामात तुरुंगवास, जाणून घ्या शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वतींविषयी

जेव्हा 1942 साली भारत छोडो आंदोलनाची घोषणा करण्यात आली, त्यावेळी स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी आंदोलनात सहभाग घेतला. वयाच्या 19 व्या वर्षीच ते क्रातीकारी साधू म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यांना वाराणसीत 9 महिने तर मध्य प्रदेशात 6 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता.

वयाच्या 9 व्या वर्षी सोडले घर, 19 व्या वर्षी क्रांतिकारी सन्यासी, स्वातंत्र्यसंग्रामात तुरुंगवास, जाणून घ्या शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वतींविषयी
शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचे निधनImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Sep 11, 2022 | 6:22 PM
Share

नरसिंहपूर- ज्योतिर्मठ बर्दीनाथ आणि शारदापीठा द्वारका यांचे शंकराचार्य असलेल्या स्वामी स्वरुपानंद सरस्वती (Shankaracharya Swami Swaroopananda)यांचे वयाच्या 98व्या निधन झाले आहे. मध्य प्रदेशात नरसिंहपूर (Narsinghpur)येथे झोतेश्वरमध्ये असलेल्या परमहंसी गंगा आश्रमात, हार्ट अटॅक आल्यामुळे दुपारी 3वाजून 50 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. स्वरुपानंद सरस्वती यांना हिंदुंचे (Hindu)सर्वात मोठे धर्मगुरु मानण्यात येत होते.

शंकराचार्य गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यांच्यावर बंगरुळुत उपचार सुरु होते. नुकतेच ते मध्य प्रदेशातील आश्रमात परतले होते. शंकराचार्य यांचे शिष्य ब्रह्म विद्यानंद यांनी सांगितले की- स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांना सोमवारी संध्याकाळी 5 वाजता परमहंसी गंगा आश्रमात समाधी देण्यात येईल. स्वामी शंकराचार्य हे स्वातंत्र्य चळवळीतही सहभागी होते. त्यावेळी त्यांनी तुरुंगवासही सहन केला आहे. राम मंदिर निर्माणासाठी त्यांनी मोठी कायदेशीर लढाई लढली होती.

वयाच्या 9 व्या वर्षी घर सोडून धर्मयात्रेला निघाले होते

शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचा जन्म मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात दिघोरी गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. लहानपणी त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय असे ठेवले होते. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी घर सोडून धर्मयात्रा सुरु केली होती. याच काळात ते काशीला पोहचले आमि तिथे ब्रह्मलीन स्वामी करपात्री महाराज यांच्याकडून त्यांनी वेदांचे आणि शास्त्रांचे शिक्षण घेतले होते.

19 व्या वर्षी स्वातंत्र्यसैनिक

जेव्हा 1942 साली भारत छोडो आंदोलनाची घोषणा करण्यात आली, त्यावेळी स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी आंदोलनात सहभाग घेतला. वयाच्या 19 व्या वर्षीच ते क्रातीकारी साधू म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यांना वाराणसीत 9 महिने तर मध्य प्रदेशात 6 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता.

1981 साली मिळाली शंकराचार्य ही उपाधी

स्वामी स्वरुपानंद 1950 मध्ये सन्यासी झाले होते. ज्योतिर्मठ पीठाचे ब्रह्मलीन शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांनी त्यांना दण्ड सन्यासाची दीक्षा दिली होती. त्यानंतर त्यांना स्वामी स्वरुपानंद सरस्वती या नावाने ओळखण्यात येउ लागले. त्यांना 1981 साली शंकाराचार्य ही उपाधी मिळाली.

राम मंदिराच्या नावावर ऑफिसला केला होता विरोध

स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी राम जन्मभूमी न्यासाच्या नावे विहिप आणि भाजपाला घेरले होते. अयोध्येत मंदिराच्या नावावर विहीप आणि भाजपा अयोध्येत त्यांचे कार्यालय तयार करीत ाहेत, ते मंजूर नसल्याचे त्यांनी म्हटले होते. हिंदूंमध्ये शंकराचार्य हे सर्वात मोठे धर्मगुरु मानले जातात. हिंदूंचे सुप्रीम कोर्ट आपण आहोत, असे ते म्हणाले होते. मंदिराचे रुप धार्मिक असायला हवे त्याला राजकीय रुप देणे अमान्य असल्याचे मत त्यांनी मांडले होते.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...