AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 9 व्या वर्षी सोडले घर, 19 व्या वर्षी क्रांतिकारी सन्यासी, स्वातंत्र्यसंग्रामात तुरुंगवास, जाणून घ्या शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वतींविषयी

जेव्हा 1942 साली भारत छोडो आंदोलनाची घोषणा करण्यात आली, त्यावेळी स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी आंदोलनात सहभाग घेतला. वयाच्या 19 व्या वर्षीच ते क्रातीकारी साधू म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यांना वाराणसीत 9 महिने तर मध्य प्रदेशात 6 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता.

वयाच्या 9 व्या वर्षी सोडले घर, 19 व्या वर्षी क्रांतिकारी सन्यासी, स्वातंत्र्यसंग्रामात तुरुंगवास, जाणून घ्या शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वतींविषयी
शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचे निधनImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Sep 11, 2022 | 6:22 PM
Share

नरसिंहपूर- ज्योतिर्मठ बर्दीनाथ आणि शारदापीठा द्वारका यांचे शंकराचार्य असलेल्या स्वामी स्वरुपानंद सरस्वती (Shankaracharya Swami Swaroopananda)यांचे वयाच्या 98व्या निधन झाले आहे. मध्य प्रदेशात नरसिंहपूर (Narsinghpur)येथे झोतेश्वरमध्ये असलेल्या परमहंसी गंगा आश्रमात, हार्ट अटॅक आल्यामुळे दुपारी 3वाजून 50 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. स्वरुपानंद सरस्वती यांना हिंदुंचे (Hindu)सर्वात मोठे धर्मगुरु मानण्यात येत होते.

शंकराचार्य गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यांच्यावर बंगरुळुत उपचार सुरु होते. नुकतेच ते मध्य प्रदेशातील आश्रमात परतले होते. शंकराचार्य यांचे शिष्य ब्रह्म विद्यानंद यांनी सांगितले की- स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांना सोमवारी संध्याकाळी 5 वाजता परमहंसी गंगा आश्रमात समाधी देण्यात येईल. स्वामी शंकराचार्य हे स्वातंत्र्य चळवळीतही सहभागी होते. त्यावेळी त्यांनी तुरुंगवासही सहन केला आहे. राम मंदिर निर्माणासाठी त्यांनी मोठी कायदेशीर लढाई लढली होती.

वयाच्या 9 व्या वर्षी घर सोडून धर्मयात्रेला निघाले होते

शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचा जन्म मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात दिघोरी गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. लहानपणी त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय असे ठेवले होते. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी घर सोडून धर्मयात्रा सुरु केली होती. याच काळात ते काशीला पोहचले आमि तिथे ब्रह्मलीन स्वामी करपात्री महाराज यांच्याकडून त्यांनी वेदांचे आणि शास्त्रांचे शिक्षण घेतले होते.

19 व्या वर्षी स्वातंत्र्यसैनिक

जेव्हा 1942 साली भारत छोडो आंदोलनाची घोषणा करण्यात आली, त्यावेळी स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी आंदोलनात सहभाग घेतला. वयाच्या 19 व्या वर्षीच ते क्रातीकारी साधू म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यांना वाराणसीत 9 महिने तर मध्य प्रदेशात 6 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता.

1981 साली मिळाली शंकराचार्य ही उपाधी

स्वामी स्वरुपानंद 1950 मध्ये सन्यासी झाले होते. ज्योतिर्मठ पीठाचे ब्रह्मलीन शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांनी त्यांना दण्ड सन्यासाची दीक्षा दिली होती. त्यानंतर त्यांना स्वामी स्वरुपानंद सरस्वती या नावाने ओळखण्यात येउ लागले. त्यांना 1981 साली शंकाराचार्य ही उपाधी मिळाली.

राम मंदिराच्या नावावर ऑफिसला केला होता विरोध

स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी राम जन्मभूमी न्यासाच्या नावे विहिप आणि भाजपाला घेरले होते. अयोध्येत मंदिराच्या नावावर विहीप आणि भाजपा अयोध्येत त्यांचे कार्यालय तयार करीत ाहेत, ते मंजूर नसल्याचे त्यांनी म्हटले होते. हिंदूंमध्ये शंकराचार्य हे सर्वात मोठे धर्मगुरु मानले जातात. हिंदूंचे सुप्रीम कोर्ट आपण आहोत, असे ते म्हणाले होते. मंदिराचे रुप धार्मिक असायला हवे त्याला राजकीय रुप देणे अमान्य असल्याचे मत त्यांनी मांडले होते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.