AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शोएब म्हणतो, ‘पाकिस्तान जिंदाबाद’, सानिया मिर्झा म्हणते…

मुंबई : 14 फेब्रुवारीला पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद संघटनेने घडवलेला पुलवाम हल्ला, त्यानंतर या हल्ल्याचा बदला म्हणून भारताच्या वायूसेनेने पाकिस्तानत घुसून बालाकोट येथील जैशच्या दहशतावदी तळांना उद्ध्वस्त केल्याची घटना, त्यानंतर पाकिस्तानची 20 लढाऊ विमानं भारतीय हद्दीत घुसणं, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरही अनेकजण व्यक्त होत आहेत. विशेषत: सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तानसंबंधी विषय येतो, त्यावेळी अनेकदा […]

शोएब म्हणतो, 'पाकिस्तान जिंदाबाद', सानिया मिर्झा म्हणते...
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

मुंबई : 14 फेब्रुवारीला पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद संघटनेने घडवलेला पुलवाम हल्ला, त्यानंतर या हल्ल्याचा बदला म्हणून भारताच्या वायूसेनेने पाकिस्तानत घुसून बालाकोट येथील जैशच्या दहशतावदी तळांना उद्ध्वस्त केल्याची घटना, त्यानंतर पाकिस्तानची 20 लढाऊ विमानं भारतीय हद्दीत घुसणं, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरही अनेकजण व्यक्त होत आहेत. विशेषत: सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तानसंबंधी विषय येतो, त्यावेळी अनेकदा पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा या सेलिब्रेटी दाम्पत्याच्या प्रतिक्रियांकडे दोन्ही देशांमधील नेटिझन्सचं लक्ष असतं.

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा हे ट्विटरवरुन व्यक्त झाले आहेत. दोघांच्या ट्वीटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दोघांचेही ट्वीट वेगवेगळ्या दिवशी असले, तरी दोघांच्या ट्वीटचा संदर्भ हा दोन्ही देशांमधील तणावाच्या स्थितीच्या मुद्द्यांशीच संबंधित आहे.

पाकिस्तानातून अभिनंदन यांना घेऊन येणारी ही महिला कोण?

शोएब मलिकने 27 फेब्रुवारी रोजी ‘हमारा पाकिस्तान जिंदाबाद’ असे ट्वीट केले आहे. 27 फेब्रुवारी म्हणजे भारताने पाकिस्तानात घुसून जैशच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केल्याचा दुसरा दिवस. म्हणजेच, या दिवशी पाकिस्तानचे 20 लढाऊ विमानं भारताच्या हद्दीत घुसले होते. मात्र, भारताच्या जोरदार प्रत्युत्तरानंतर ते माघार पळाले. त्यावेळी शोएब मलिकाने ‘हमारा पाकिस्तान जिंदाबाद’ असे ट्वीट केले होते.

त्याच दिवशी, म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना प्रत्युत्तर देताना, भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडलं. त्यानंतर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं. अभिनंदन यांची काल म्हणजे 1 मार्च रोजी पाकिस्तानकडून सुटका करण्यात आली.

भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानातून मायदेशी म्हणजेच भारतात परतल्यानंतर भारतीय टेनिसस्टार आणि क्रिकेटर शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झा हिने स्वागताचे ट्वीट केले. शिवाय, ‘जय हिंद’ असेही म्हटले.

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचे लग्न झाले आहे. पारंपरिक शत्रू असलेल्या दोन देशांतील हे दोघेजण, मात्र दोघेही व्यक्त होत असताना, त्यांच्यात समोरील देशाबद्दल शत्रुत्वाची भावना दिसत नाही. आपापल्या देशाचा अभिमान दिसून येतो. किंबहुना, शोएब आणि सानिया हे दोघेही अत्यंत भान बाळगून सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. मात्र, ट्रोलिंग करणारे या ना त्या मार्गाने त्यांना ट्रोल करतातच.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...