AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Irani | ‘यू आर नॉट इंडिया’ राहुल गांधी यांच्या भाषणानंतर स्मृती इराणी संसदेत कडाडल्या

Smriti Irani | "भारत मातेची हत्या झाली, बोलल्यावर टाळ्या वाजवण्यात आल्या. यावरुन दिसून येतं, कोणाच्या मनात गद्दारीची भावना आहे." असं स्मृती इराणी म्हणाल्या. "मणिपूर विभाजीत नाहीय, तो देशाचा अविभाज्य भाग आहे"

Smriti Irani | 'यू आर नॉट इंडिया' राहुल गांधी यांच्या भाषणानंतर स्मृती इराणी संसदेत कडाडल्या
smriti irani Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 09, 2023 | 1:30 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज संसदेत मणिपूर मुद्यावर आक्रमक भाषण केलं. त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या या भाषणाचा केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी समाचार घेतला. भाषाणाच्या सुरुवातीलाच ‘यू आर नॉट इंडिया’ असं स्मृती इराणी म्हणाल्या.

“अध्यक्ष महोदय आज तुमच्या आसनासमोर ज्या प्रकारच आक्रमक वर्तन पहायला मिळालं, ते मान्य नाही. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भारत मातेची हत्या केली, असं बोललं गेलं. काँग्रेस पक्ष त्यावेळी इथे टाळ्या वाजवत होता. भारत मातेची हत्या झाली, बोलल्यावर टाळ्या वाजवण्यात आल्या. यावरुन दिसून येतं, कोणाच्या मनात गद्दारीची भावना आहे. मणिपूर विभाजीत नाहीय, तो देशाचा अविभाज्य भाग आहे” असं स्मृती इराणी म्हणाल्या.

‘राहुल गांधी तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर….’

“तुमच्या सहकारी पक्षाचा नेता तामिळनाडूत काय म्हणाला? भारताचा अर्थ फक्त उत्तर भारत होतो. राहुल गांधी यांच्यामध्ये हिम्मत असेल, तर तुम्ही तुमचा सहकारी डीएमकेच म्हणणं खोडून दाखवा. काश्मीरला भारतापासून वेगळ केलं पाहिजे असं जो काँग्रेस नेता म्हणतो, त्यावर तुम्ही का बोलत नाही?” असं स्मृती इराणी म्हणाल्या.

‘काश्मिरी पंडितांवर बोलाव अशी तुमची इच्छा नाही’

“स्मृती इराणी यांनी आपल्या भाषणात काश्मीर पंडितांवर झालेल्या अत्याचाराचा उल्लेख केला. स्मृती इराणी यांनी गिरिजा टिक्कू, शीला भट्ट यांच्यासोबत झालेल्या घटनांचा उल्लेख केला. आम्ही काश्मिरी पंडितांवर बोलाव अशी तुमची इच्छा नाही” असं स्मृती इराणी म्हणाल्या. जम्मू-काश्मीर मुद्यावरुन काँग्रेसला घेरलं

स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. “एकवेळ अशी होती की, काश्मीरमध्ये रक्तपात झालेला. पण राहुल गांधी जेव्हा काश्मीरमध्ये आपल्या नातेवाईकांसोबत पोहोचले, तिथे फिरत होते. हे मोदी सरकारने काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यामुळे शक्य झालं. काँग्रेस नेते पुन्हा तिथे गेले, त्यावेळी त्यांनी अनुच्छेद 370 लागू करण्याबद्दल भाष्य केलं” असं स्मृती इराणी म्हणाल्या.

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......