AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरात सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का, बिल्कीस बानो प्रकरणात निर्णय फिरवला

Supreme Court on Bilkis Bano Case : बिल्कीस बानो प्रकरणात गुजरात सरकारला सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. या प्रकरणात अकरा आरोपींची मुक्तता करण्याचा राज्य सरकारचा निर्णय न्यायालयाने रद्द केला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्व आरोपींना कारागृहात जावे लागणार आहे.

गुजरात सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का, बिल्कीस बानो प्रकरणात निर्णय फिरवला
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 08, 2024 | 12:39 PM
Share

नवी दिल्ली, दि. 8 जानेवारी 2024 | बिल्कीस बानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. या प्रकरणात गुजरात सरकारने ११ आरोपींची मुक्तता केली होती. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. न्यायमूर्ती बिवी नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने हा निर्णय रद्द केला आहे. सर्व आरोपींची सुटका अवैध आहे. शिक्षेत दिलेली सूट योग्य नाही. महिला ही सन्मानाची हक्कदार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

काय होता प्रकार

ऑगस्ट २०२२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या ११ आरोपींची गुजरात सरकारने सुटका केली होती. या सुटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. १२ ऑक्टोबर २०२३ ला न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच दोषींची सुटका केल्यामुळे न्यायालयाने सुनावणीवेळी नाराजी व्यक्त केली होती. परंतु गुजरात सरकारने दोषींची सुटका योग्य असल्याचा दावा युक्तावाद करताना केला होता. त्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.

काय दिला निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारने दिलेला निर्णय रद्द केला आहे. राज्य सरकार हा निर्णय घेण्यास सक्षम नाही. हा फसवणुकीचा प्रकार आहे. महिलांचा सन्मान केला पाहिजे. या प्रकरणात महाराष्ट्र आणि गुजरातमधील कनिष्ठ न्यायालयाने निर्णय दिला होता. त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती. या शब्दांत गुजरात सरकारला फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व अकरा आरोपींना आता जेलमध्ये जावे लागणार आहे. जसवंत नाई, गोविंद नाई, शैलेश भट्ट, राध्येशम शाह, बिपिन चंद्र जोशी, केसरभाई वोहनिया, प्रदीप मोर्दहिया, बकाभाई वोहनिया, राजूभाई सोनी, मितेश भट्ट आणि रमेश चंदना हे अकरा जण या प्रकरणात आरोपी आहेत. 15 ऑगस्ट 2022 रोजी या आरोपींची पंधरा वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले होते. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती.

कोण होती बिल्कीस बानो

बिल्कीस बानो ही गुजरातमधील 21 वर्षीय महिला होती. गोध्रा प्रकरणानंतर गुजरात दंगली दरम्यान ती पाच महिन्याची गर्भवती असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. 3 मार्च 2002 रोजी तिच्या तीन वर्षांच्या मुलीसह परिवारातील सात जणांची हत्या करण्यात आली होती.

हे ही वाचा

जगभरात चर्चेत आलेले बिल्कीस बानो प्रकरण काय आहे ? कोण होती बिल्कीस बानो

Follow Us
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?