AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत धर्मशाळा नाही, आश्रय का द्यायचा? निर्वासितांवर सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

भारतात बांगलादेश तसेच श्रीलंकेतून अवैध पद्धतीने येणाऱ्या नागरिकांची समस्या फार जुनी आहे. या देशांतील काही नागरिक भारतात येऊन स्थायीक होतात आणि कालांतराने भारताचे नागरिकत्त्व मागतात. सध्या भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर याच मुद्द्यावरून तणावाची स्थिती झाली आहे.

भारत धर्मशाळा नाही, आश्रय का द्यायचा? निर्वासितांवर सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!
supreme court
| Updated on: May 19, 2025 | 4:37 PM
Share

Supreme Court : भारतात बांगलादेश तसेच श्रीलंकेतून अवैध पद्धतीने येणाऱ्या नागरिकांची समस्या फार जुनी आहे. या देशांतील काही नागरिक भारतात येऊन स्थायीक होतात आणि कालांतराने भारताचे नागरिकत्त्व मागतात. सध्या भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर याच मुद्द्यावरून तणावाची स्थिती झाली आहे. असे असतानाच आता सर्वोच्च न्यायालयाने निर्वासितांबाबत एक मोठी टिप्पणी केली आहे. जगभरातील निर्वासितांना भारतात का आश्रय द्यायचा? असा रोखठोक सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला आहे.

सर्वोच्च न्यायालय नेमकं काय म्हणालं?

निर्वासित व्यक्तीच्या जीवाला श्रीलंकेत धोका आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला भारतात राहण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वकिलाने केला होता. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. या याचिकेच्या माध्यमातून मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते. याचिकाकार्ता हा श्रीलंकन तमिळ आहे. ही व्यक्ती व्हिसा घेऊन भारतात आली होती. श्रीलंकेत या व्यक्तीच्या जीवाला धोका आहे. याचिकार्ता कोणत्याही निर्वासनाच्या प्रक्रियेविना तीन वर्षांपासून ताब्यात आहे. या व्यक्तीला भारतातच राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.

याचिकेवर कोर्ट काय म्हणालं?

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालायाने कठोर टिप्पणी केली. जगभरातील शरणार्थींना राहण्यास परवानगी देण्यासाठी भारत देश एखादी धर्मशाळा नाही. जगभरातील निर्वासितांना भारतात स्थान देणे शक्य आहे का. आपण 140 कोटोी लोक इथे अनेक अडचणींना तोंड देतो. भारत एखादी धर्मशाळा नाही, असे न्यायालयाने म्हटले. तसेच याचिकाकर्त्याच्या अटकेबाबतच्या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

तुमचा जीव स्वत:च्या देशात धोक्यात असेल तर…

तसेच, “तुम्हाला इथं स्थायिक होण्याचा काय अधिकार आहे ? तुमचा जीव स्वत:च्या देशात धोक्यात असेल तर दुसऱ्या देशात जा,” असंही न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, बांगलादेश तसेच श्रीलंका या दोन्ही देशांतील नागरिक भारतात घुसखोरी करतात. अशा स्थितीत न्यायालयाच्या या टिप्पणीला फार महत्त्व आले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.