AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamil Nadu Exit Poll 2026 : तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये मोठी उलटफेर? स्टॅलिन नव्हे हा नेता हवाय मुख्यमंत्री, पण…

तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 च्या एक्झिट पोलनुसार, विजय मुख्यमंत्रीपदासाठी एम. के. स्टॅलिन यांच्यापेक्षा अधिक पसंतीचे उमेदवार ठरले आहेत. ॲक्सिस माय इंडियाने विजय यांना 37%, तर स्टॅलिन यांना 35% पसंती दिली आहे. मात्र, इतर अनेक सर्वेक्षणांमध्ये DMK पुन्हा सत्ता स्थापन करेल असा अंदाज आहे. विजय यांच्या TVK पक्षाची पहिल्याच निवडणुकीत चांगली कामगिरी अपेक्षित आहे, तरीही अंतिम निर्णय 4 मे रोजी स्पष्ट होईल.

Tamil Nadu Exit Poll 2026 : तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये मोठी उलटफेर? स्टॅलिन नव्हे हा नेता हवाय मुख्यमंत्री, पण…
तामिळनाडूत कोणाचं येणार सरकार ?
| Updated on: Apr 30, 2026 | 8:56 AM
Share

तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 नंतर आलेल्या एग्झिट पोलमधूनएक रंजक चित्र समोर आलं आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या ताज्या सर्व्हेनुसार, तामिळनाडूत मोठा उलटफेर होऊ शकतो. चित्रपट अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे विजय, हे आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यापेक्षा पुढे असल्याचे दिसत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात, 37 टक्के लोकांनी तमिळगा वेत्री कळघमचे (TVK) प्रमुख विजय यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे, तर एम. के. स्टॅलिन यांना 35 टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे, या दोघांमध्ये अटीतटीची लढत रंगणार असल्याचे दिसत आहे.

तर माजी मुख्यमंत्री एडप्पाडी के. पलानीस्वामी हे तिसऱ्या स्थानावर असून त्यांना 22 टक्के लोकांचा पाठिंबा मिळाल्याचं दिसून आलं. भाजप नेते अण्णामलाई यांना केवळ 2 टक्के लोकांची पसंती आहे. नाम तमिळर कचीचे नेते सेंथमिझन सीमन यांना 3 टक्के लोकांचा पाठिंबा असून, 1 टक्के लोकांनी एकतर दुसऱ्या कोणाला तरी निवडले आहे किंवा ते कोणताही निर्णय घेऊ शकलेले नाहीत.

तामिळनाडूत कोणाचं येणार सरकार ?

एक्झिट पोलच्या उर्वरित आकडेवारीवर नजर टाकल्यास, बहुतेक सर्वेक्षणांनुसार एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर येऊ शकतं. याचा अर्थ असा की, मुख्यमंत्रीपदासाठी विजय हे पसंतीचे उमेदवार दिसत असले तरी, सरकार स्थापन करण्यात DMKचे पारडं जड राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, विजय यांचा पक्ष, टीव्हीके, आपल्या पहिल्या निवडणुकीत चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा अनेकांना आहे. विविध एजन्सींच्या अंदाजात थोडीफार तफावत दिसून येत आहे. पीपल्स पल्सच्या अंदाजानुसार टीव्हीकेला 18 ते 24 जागा मिळतील, तर पी-मार्कच्या अंदाजानुसार त्यांना 16 ते 26 पर्यंत जागा मिळतील. ॲक्सिस माय इंडियाचे अंदाज वेगळे असून, त्यांच्या अंदाजानुसार टीव्हीकेला 98 ते 120 जागा मिळतील, हा अतिशय मोठा आकडा आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात यावेळी एक नवीन वळण येताना दिसत असून एक नवीन पक्ष आणि एका नवीन चेहऱ्याने प्रबळ आव्हान उभं केलं आहे. मात्र हे केवळ अंदाज आहेत आणि खरं चित्र काय ते 4 मे रोजी निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. राज्यातील सत्ता कोणाच्या जाते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....