AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon : मान्सूनची सुरवात धिम्या गतीने, अंतिम टप्प्यात कसे राहणार चित्र..! ‘या’ दोन शहरांना झोडपणार पाऊस

पश्चिम महाराष्ट्रातील धरणे ही सततच्या पावसाने यापूर्वीच ओव्हरफ्लो झालेली आहेत. यातच पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज वर्तवल्याने आता पुन्हा धरणांमधील अतिरिक्त पाणी हे नदी पात्रात सोडण्याची नामुष्की ओढावणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

Monsoon : मान्सूनची सुरवात धिम्या गतीने, अंतिम टप्प्यात कसे राहणार चित्र..! 'या' दोन शहरांना झोडपणार पाऊस
आगामी दोन दिवस राज्यात पावसाची हजेरी राहणार आहे
| Updated on: Sep 16, 2022 | 2:13 PM
Share

पुणे : राज्यात परतीच्या पावसाला सुरवात झाली आहे. (The vagaries of nature) निसर्गाचा लहरीपणा काय असतो याचा प्रत्यय यंदा राज्यभरातील बळीराजाला आला आहे. सध्या (Monsson Season) पावसाळा अंतिम टप्प्यात असून जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी ही ओलांडली आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी दोन दिवस राज्यात पावसाची हजेरी असणार तर (Mumbai- Pune) मुंबई आणि पुण्यात पाऊस हा धो-धो बरसणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. शिवाय गेल्या दोन दिवसांपासून या शहरांमध्ये पाऊस हा सुरुच आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे अशा सूचना प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे हे उत्तरेकडे वाहत आहे.तर दुसरीकडे हिमालयाच्या पायथ्याशी उत्तर प्रदेशामध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होतोय. यातच गुजरातमध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा हा महाराष्ट्राकडे सरकण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात विशेष करुन पुणे आणि मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य राहिलेले आहे. त्यामुळे आता पावसाने हजेरी लावली तरी नदी, नाले, ओढे यांना पाणी येणार आहे. तसेच रस्ते जलमय होणार असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील धरणे ही सततच्या पावसाने यापूर्वीच ओव्हरफ्लो झालेली आहेत. यातच पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज वर्तवल्याने आता पुन्हा धरणांमधील अतिरिक्त पाणी हे नदी पात्रात सोडण्याची नामुष्की ओढावणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. पुण्यात दोन दिवस संततधार राहणार आहे.

पुढील एक ते दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, औरंगाबाद, जालना आणि विदर्भातील तुरळक भागांत 18 आणि 19 सप्टेंबरला हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाचे अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे.

खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत झालेल्या पावासाच्या जोरावर खरिपातील सर्वच पिके बहरात आहेत. शिवाय आता पाऊस झाला नाही तरी उत्पादनावर परिणाम होणार नाही. मात्र, पाऊस लागूम राहिला तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

Follow Us
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा.
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण.
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'.
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस...
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस....
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार.
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध.