AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर कोरोनाची लागण, नवरदेव थेट व्हेंटिलेटरवर; आठवड्याभरातच काळानं गाठलं!

सरकारने कितीही जनजागृती केली, निर्बंध आणले तरी विवाह समारंभासारखे कार्यक्रम सर्रास पार पडत आहेत. कोरोना काळात असाच एक विवाह समारंभ थेट नवरदेवाच्याच जीवावर बेतल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. (The groom corona positive at the wedding, death within a week)

लग्नानंतर कोरोनाची लागण, नवरदेव थेट व्हेंटिलेटरवर; आठवड्याभरातच काळानं गाठलं!
लग्नातच नवरदेवाला कोरोनाची लागण
| Updated on: May 19, 2021 | 10:26 PM
Share

मध्य प्रदेश : सध्या देशभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. अनेकांचा कोरोनाने बळी घेतलाय. देशात दररोज लाखोंच्या संख्येने रुग्णसंख्या वाढत आहे. मास्क लावणे, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदि नियम पाळण्याचे आवाहन वारंवार सरकार करीत आहे. कोरोनाचे एवढे भयाण वास्तव डोळ्यासमोर असतानाही काही नागरिकांमध्ये याबाबत अजिबात गांभीर्य दिसत नाही. सरकारने कितीही जनजागृती केली, निर्बंध आणले तरी विवाह समारंभासारखे कार्यक्रम सर्रास पार पडत आहेत. कोरोना काळात असाच एक विवाह समारंभ थेट नवरदेवाच्याच जीवावर बेतल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. (The groom corona positive at the wedding, death within a week)

25 एप्रिल रोजी झाला विवाह

मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील पचोर शहरातील अजय शर्मा नामक 25 वर्षीय युवकाचा 25 एप्रिल रोजी सिहोर येथे विवाह संपन्न झाला. कोरोना नियमांचे पालन करीत एका मंदिरात मर्यादित लोकांमध्ये हा विवाह पार पडला. विवाहाच्या चार-पाच दिवसानंतर अजयला त्रास जाणवू लागला आणि शेवटी 29 एप्रिल रोजी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. कुटुंबातील सदस्यांपैकी एक महिलाही कोरोना पॉझिटिव्ह आढळली.

भोपाळमध्ये सुरु होते उपचार

कोरोना युगात लग्न करून एका कुटुंबाचा आनंद उध्वस्त झाला. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील एका 25 वर्षीय व्यक्तीचा लग्नात कोरोना संसर्ग झाला. भोपाळमधील कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह आल्यानंतर अजयवर स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खालावत चालल्याने त्याला भोपाळला हलविण्यात आले. भोपाळच्या रुग्णालयात एक आठवडा अजय व्हेंटिलेटरवर होता. मात्र उपचारांचा काहीच फायदा झाला नाही. अखेर एक आठवड्याच्या अपयशी झुंजीनंतर अजयची प्राणज्योत मालवली.

नवरदेवाची वहिनीही कोरोना पॉझिटिव्ह

अजयचा विवाह राजगढ जिल्ह्यातील नरसिंहगढ ब्लॉकमधील मोतीपुरा गावातील अन्नू शर्मा नावाच्या तरुणीशी झाला. अन्नूचे कुटुंब सिहोरमध्ये वास्तव्यास असल्याने विवाह तेथेच पार पडला. या विवाहात कुटुंबातील काही निवडक सदस्यच उपस्थित होते. अजयची वहिनीही कोरोना पॉझिटिव्ह असून कुटुंबातील बाकी सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना प्रोटोकॉलनुसार तरुणावर भोपाळमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या राजगढमध्ये विवाह आणि सामूहिक कार्यक्रमांवर बंदी आहे. मात्र काही लोक सरकारच्या निर्बंधांना केराची टोपली दाखवत चोरुन विवाह करत आहेत. कोरोना काळात थोडासा बेजबाबदारपणा आपल्या आणि कुटुंबाच्या जीवावर बेतू शकतो. (The groom corona positive at the wedding, death within a week)

इतर बातम्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत, 22 मे पासून ऑनलाईन अर्ज करा

Video: नाम भी राजीव था..और हम से छीने भी उसी उम्र में गये, सातवांच्या प्रार्थना सभेत प्रियंका गांधींचा हुंदका दाटला

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.