AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील ‘या’ राज्यांची लोकसंख्या काही देशांपेक्षा जास्त, लवकरच चीनलाही टाकणार मागे

लोकसंख्येच्या बाबतीत 2023 मध्ये भारत चीनलाही मागे टाकणार असल्याचा धक्कादायक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भारतातील 'या' राज्यांची लोकसंख्या काही देशांपेक्षा जास्त, लवकरच चीनलाही टाकणार मागे
भारताची लोकसंख्या Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 11, 2022 | 8:04 PM
Share

मुंबई,  सध्या देशात आणि जगात पुन्हा एकदा लोकसंख्येची (Population) चर्चा जोरात सुरू आहे. संयुक्त राष्ट्राने नोव्हेंबर महिन्यात जगाची लोकसंख्या 800 दशलक्ष होण्याची शक्यता वर्तवली आहे. अशा स्थितीत पृथ्वी 800 कोटी लोकसंख्येचा भार पेलणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सगळ्यांमध्ये जगाचे लक्ष भारताच्या लोकसंख्येकडे (Population of India) देखील असल्याचे वेळोवेळी दिसून येते. धक्कादायक बाब म्हणजे 2023 मध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे.  त्यामुळे भारतासाठी साहजिकच जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर आव्हाने आहेत. भारतातील काही राज्यांची लोकसंख्या जगातील अनेक देशांपेक्षा जास्त आहे.

2023 मध्ये चीनला मागे टाकणार भारत

युनायटेड नेशन्सच्या जुलै 2022 च्या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स, 2022 अहवालानुसार, 2023 मध्ये भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकेल. म्हणजेच पुढील वर्षी भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. अहवालानुसार 2022 मध्ये चीनची लोकसंख्या 1426 दशलक्ष असेल तर भारताची लोकसंख्या 1412 दशलक्ष असेल. भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या 17 टक्के आहे.

डब्ल्यूडब्ल्यूएफ आणि ग्लोबल प्रिंट नेटवर्कच्या 2022 च्या अहवालानुसार, भारताची लोकसंख्या पाहता, पृथ्वीवरील जैविक संसाधनांमध्ये 171 टक्के कमतरता आहे. ही तूट खूप मोठी आहे.

दुसरीकडे, राज्यांच्या आधारावर पाहिले तर भारतातील अनेक राज्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपेक्षा जास्त आहेत. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशची लोकसंख्या सध्याच्या अंदाजानुसार 23 कोटींवर पोहोचली आहे. या आधारावर तो जगातील पाचव्या क्रमांकाच्या लोकसंख्येच्या देशाच्या मानांकनावर पोहोचला आहे. सध्या पाकिस्तानची लोकसंख्या तितकीच आहे. त्याच वेळी, ब्राझील, नायजेरिया, बांगलादेश, रशिया, मेक्सिको सारखे टॉप-10 देश मागे पडले आहेत.

Follow Us
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम.
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप.