AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तांब्याच्या भांड्यातील पाणी कोणी पिऊ नये? फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, परंतु विशिष्ट शारीरिक समस्या असलेल्या लोकांसाठी ते घातक ठरू शकते. याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात वाचा.

| Updated on: Mar 10, 2026 | 1:58 PM
Share
आयुर्वेदापासून ते आधुनिक विज्ञानापर्यंत शरीर निरोगी ठेवण्यासाठी दिवसाला किमान 2 ते 3 लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शुद्धीकरणासाठी अनेक घरांमध्ये तांब्याच्या भांड्यातील पाणी वापरण्याची परंपरा आहे.

आयुर्वेदापासून ते आधुनिक विज्ञानापर्यंत शरीर निरोगी ठेवण्यासाठी दिवसाला किमान 2 ते 3 लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शुद्धीकरणासाठी अनेक घरांमध्ये तांब्याच्या भांड्यातील पाणी वापरण्याची परंपरा आहे.

1 / 8
तांब्याचे पाणी शरीरातील दोष कमी करते असे मानले जात असले तरी ते सर्वांसाठीच फायदेशीर ठरते असे नाही. विशिष्ट शारीरिक स्थिती असलेल्या लोकांसाठी हे पाणी समस्यांचे कारण बनू शकते. त्यामुळे आज आपण तांब्याच्या भांड्यातील पाणी कोणी पिऊ नये, याबद्दल माहिती घेणार आहोत.

तांब्याचे पाणी शरीरातील दोष कमी करते असे मानले जात असले तरी ते सर्वांसाठीच फायदेशीर ठरते असे नाही. विशिष्ट शारीरिक स्थिती असलेल्या लोकांसाठी हे पाणी समस्यांचे कारण बनू शकते. त्यामुळे आज आपण तांब्याच्या भांड्यातील पाणी कोणी पिऊ नये, याबद्दल माहिती घेणार आहोत.

2 / 8
मधुमेहाची औषधे सुरू असताना तांब्याचे पाणी प्यायल्यास औषधांचा शरीरावर होणारा परिणाम कमी होऊ शकतो. तसेच मधुमेहामुळे आधीच किडनी कमकुवत झालेली असते. 
त्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने किडनीवर अधिक ताण येऊ शकतो.

मधुमेहाची औषधे सुरू असताना तांब्याचे पाणी प्यायल्यास औषधांचा शरीरावर होणारा परिणाम कमी होऊ शकतो. तसेच मधुमेहामुळे आधीच किडनी कमकुवत झालेली असते. त्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने किडनीवर अधिक ताण येऊ शकतो.

3 / 8
तांब्याच्या भांड्यातील पाण्याची प्रकृती मुळात गरम असते. ज्या लोकांच्या शरीरात आधीच उष्णता जास्त आहे किंवा ज्यांना पित्ताचा त्रास होतो, त्यांनी हे पाणी प्यायल्यास शरीरातील उष्णता अधिक वाढू शकते. यामुळे पोटात जळजळ होणे, छातीत जळजळणे किंवा त्वचेवर पुरळ येणे अशा समस्या उद्भवू शकतात.

तांब्याच्या भांड्यातील पाण्याची प्रकृती मुळात गरम असते. ज्या लोकांच्या शरीरात आधीच उष्णता जास्त आहे किंवा ज्यांना पित्ताचा त्रास होतो, त्यांनी हे पाणी प्यायल्यास शरीरातील उष्णता अधिक वाढू शकते. यामुळे पोटात जळजळ होणे, छातीत जळजळणे किंवा त्वचेवर पुरळ येणे अशा समस्या उद्भवू शकतात.

4 / 8
आपले शरीर तांब्यातील अंश एका मर्यादेपर्यंतच पचवू शकते. ज्यांना किडनी किंवा यकृताचे गंभीर आजार आहेत, त्यांच्या शरीराला हे तांब्याचे कण गाळून बाहेर काढणे कठीण जाते. यामुळे रक्तामध्ये तांब्याचे प्रमाण वाढून रक्ताच्या शुद्धीकरणात अडथळे निर्माण होऊ शकतात, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

आपले शरीर तांब्यातील अंश एका मर्यादेपर्यंतच पचवू शकते. ज्यांना किडनी किंवा यकृताचे गंभीर आजार आहेत, त्यांच्या शरीराला हे तांब्याचे कण गाळून बाहेर काढणे कठीण जाते. यामुळे रक्तामध्ये तांब्याचे प्रमाण वाढून रक्ताच्या शुद्धीकरणात अडथळे निर्माण होऊ शकतात, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

5 / 8
लहान मुलांची पचनसंस्था अजून पूर्णपणे विकसित झालेली नसते. तांब्याच्या पाण्यातील खनिजे पचवण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जा आणि ताकद लागते. लहान मुलांच्या नाजूक पचनशक्तीवर यामुळे ताण येऊ शकतो, ज्यामुळे त्यांना अपचन किंवा उलट्यांसारखे त्रास होऊ शकतात.

लहान मुलांची पचनसंस्था अजून पूर्णपणे विकसित झालेली नसते. तांब्याच्या पाण्यातील खनिजे पचवण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जा आणि ताकद लागते. लहान मुलांच्या नाजूक पचनशक्तीवर यामुळे ताण येऊ शकतो, ज्यामुळे त्यांना अपचन किंवा उलट्यांसारखे त्रास होऊ शकतात.

6 / 8
कोणतीही गोष्ट अति प्रमाणात केल्यास ती नुकसान करते. जर तुम्ही दिवसभर फक्त तांब्याच्या भांड्यातीलच पाणी पीत असाल, तर शरीरात तांब्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होऊ शकते. यामुळे जुलाब, मळमळ किंवा पोटदुखी यांसारखे लक्षणे दिसू शकतात.

कोणतीही गोष्ट अति प्रमाणात केल्यास ती नुकसान करते. जर तुम्ही दिवसभर फक्त तांब्याच्या भांड्यातीलच पाणी पीत असाल, तर शरीरात तांब्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होऊ शकते. यामुळे जुलाब, मळमळ किंवा पोटदुखी यांसारखे लक्षणे दिसू शकतात.

7 / 8
त्यामुळे तांब्याच्या भांड्यांमधील पाणी पिण्याआधी तुमची प्रकृती कशी आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच जर तुम्हाला वरीलपैकी कोणताही त्रास असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तांब्याचे पाणी पिऊ नका. तहान लागेल तेव्हा साधे पाणी पिणे शरीरासाठी कधीही उत्तम मानले जाते.

त्यामुळे तांब्याच्या भांड्यांमधील पाणी पिण्याआधी तुमची प्रकृती कशी आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच जर तुम्हाला वरीलपैकी कोणताही त्रास असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तांब्याचे पाणी पिऊ नका. तहान लागेल तेव्हा साधे पाणी पिणे शरीरासाठी कधीही उत्तम मानले जाते.

8 / 8
Follow Us
MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा
Aaditya Thackeray PC | MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं!
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MPSC Paper Case | कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल, सकाळपासूनच... हे काय घडलं?
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट...
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी