AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेने भारताचे केले असे कौतूक की चीन आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढलं

भारताचे येत्या काही वर्षात वर्चस्व फक्त आशिया खंडातच नाही तर जगभरात वाढणार आहे. अमेरिकेचे राजदूत यांनी देखील भारताचे कौतूक केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पाकिस्तान आणि चीनचे टेन्शन वाढले आहे. कारण दोन्ही देश हे भारताचे वर्चस्व वाढू नये म्हणून प्रयत्न करत असतात.

अमेरिकेने भारताचे केले असे कौतूक की चीन आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढलं
usa on india
| Updated on: Apr 10, 2024 | 5:36 PM
Share

India and USA : भारताने नेहमीच मित्रदेशांसोबत नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत. भारत हा असा देश आहे जो कधीही कोणावर आधी हल्ला करत नाही. भारतावर अनेक देशांचा विश्वास आहे. म्हणूनच अनेक मुस्लीम देशही नेहमीच भारताचे कौतूक करत आले आहेत. इतकंच नाही तर इस्रायलने देखील भारतासाठी नेहमीच मदतीची भूमिका घेतली आहे. अमेरिकेने देखील आता भारताचे कौतूक केले आहे. भारताचे होत असलेले कौतूक पाहून चीन आणि पाकिस्तान यांना नक्कीच मिर्ची लागली असेल.

अमेरिकेने केलेल्या या स्तुतीमुळे  शेजारी देश चीन आणि पाकिस्तानला धक्का बसला आहे. अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी भारताबद्दल जे काही बोलले त्यावरून भारताचे भविष्यातील स्थान कुठे असेल याचे नक्कीच संकेत मिळत आहेत. एरिक गार्सेटी यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध एकमेकांना पूरक असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेसाठी भारताला विशेष महत्त्व असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी इथेच थांबले नाहीत, ते म्हणाले की, तुम्हाला जर भविष्य बघायचे असेल तर भारतात या. तुम्हाला भविष्य अनुभवायचे असेल तर भारतात या. तुम्हाला भविष्यावर काम करायचे असेल तर भारतात या. मला युनायटेड स्टेट्स मिशनचा नेता म्हणून काम करण्याचा बहुमान मिळाला आहे.

‘भारत हा महत्त्वाचा देश आहे’

एरिक गार्सेट्टी यांनी अनेकदा भारताचे कौतूक केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासाठी भारत हा सर्वात महत्त्वाचा देश असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच त्यांनी राजदूताची भूमिका स्वीकारल्याचे याआधी गार्सेट्टी यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथे ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेटने आयोजित केलेल्या एनर्जी ट्रान्झिशन डायलॉग्समध्ये बोलत असताना ते म्हणाले की, अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध हे या शतकातील सर्वात परिभाषित नाते आहे.

गार्सेटी हे बायडेन यांच्या जवळचे

एरिक गार्सेटी हे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे एरिक यांनी केलेले विधान खूप महत्त्वाचे आहे. यामुळे भविष्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कसे असतील याचे हे संकेत आहेत. गेल्या दशकात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध घट्ट झाले आहेत.अमेरिकेला भारताचे आशिया खंडातील आणि जगात वाढत असलेले वर्चस्व पाहता माहित आहे. अमेरिकेत भारतीय वंशाचे लोकं मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळे अमेरिकेच्या निवडणुकीत देखील भारताला विशेष महत्त्व आहे.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.