AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेने भारताचे केले असे कौतूक की चीन आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढलं

भारताचे येत्या काही वर्षात वर्चस्व फक्त आशिया खंडातच नाही तर जगभरात वाढणार आहे. अमेरिकेचे राजदूत यांनी देखील भारताचे कौतूक केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पाकिस्तान आणि चीनचे टेन्शन वाढले आहे. कारण दोन्ही देश हे भारताचे वर्चस्व वाढू नये म्हणून प्रयत्न करत असतात.

अमेरिकेने भारताचे केले असे कौतूक की चीन आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढलं
usa on india
| Updated on: Apr 10, 2024 | 5:36 PM
Share

India and USA : भारताने नेहमीच मित्रदेशांसोबत नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत. भारत हा असा देश आहे जो कधीही कोणावर आधी हल्ला करत नाही. भारतावर अनेक देशांचा विश्वास आहे. म्हणूनच अनेक मुस्लीम देशही नेहमीच भारताचे कौतूक करत आले आहेत. इतकंच नाही तर इस्रायलने देखील भारतासाठी नेहमीच मदतीची भूमिका घेतली आहे. अमेरिकेने देखील आता भारताचे कौतूक केले आहे. भारताचे होत असलेले कौतूक पाहून चीन आणि पाकिस्तान यांना नक्कीच मिर्ची लागली असेल.

अमेरिकेने केलेल्या या स्तुतीमुळे  शेजारी देश चीन आणि पाकिस्तानला धक्का बसला आहे. अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी भारताबद्दल जे काही बोलले त्यावरून भारताचे भविष्यातील स्थान कुठे असेल याचे नक्कीच संकेत मिळत आहेत. एरिक गार्सेटी यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध एकमेकांना पूरक असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेसाठी भारताला विशेष महत्त्व असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी इथेच थांबले नाहीत, ते म्हणाले की, तुम्हाला जर भविष्य बघायचे असेल तर भारतात या. तुम्हाला भविष्य अनुभवायचे असेल तर भारतात या. तुम्हाला भविष्यावर काम करायचे असेल तर भारतात या. मला युनायटेड स्टेट्स मिशनचा नेता म्हणून काम करण्याचा बहुमान मिळाला आहे.

‘भारत हा महत्त्वाचा देश आहे’

एरिक गार्सेट्टी यांनी अनेकदा भारताचे कौतूक केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासाठी भारत हा सर्वात महत्त्वाचा देश असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच त्यांनी राजदूताची भूमिका स्वीकारल्याचे याआधी गार्सेट्टी यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथे ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेटने आयोजित केलेल्या एनर्जी ट्रान्झिशन डायलॉग्समध्ये बोलत असताना ते म्हणाले की, अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध हे या शतकातील सर्वात परिभाषित नाते आहे.

गार्सेटी हे बायडेन यांच्या जवळचे

एरिक गार्सेटी हे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे एरिक यांनी केलेले विधान खूप महत्त्वाचे आहे. यामुळे भविष्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कसे असतील याचे हे संकेत आहेत. गेल्या दशकात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध घट्ट झाले आहेत.अमेरिकेला भारताचे आशिया खंडातील आणि जगात वाढत असलेले वर्चस्व पाहता माहित आहे. अमेरिकेत भारतीय वंशाचे लोकं मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळे अमेरिकेच्या निवडणुकीत देखील भारताला विशेष महत्त्व आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.