AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिघे एकत्र ऑफिसला जायचे, एकत्र घरी यायचे, तिघांनी एकत्रच घेतला जगाचा निरोप; तिघा भावांसोबत नेमके काय घडले?

तिघे भाऊ नेहमीप्रमाणे काम आटोपून आपल्या गाडीने घरी परतत होते. मात्र घरी पोहचण्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. यानंतर तिघांचे थेट मृतदेहच घरी पोहचले.

तिघे एकत्र ऑफिसला जायचे, एकत्र घरी यायचे, तिघांनी एकत्रच घेतला जगाचा निरोप; तिघा भावांसोबत नेमके काय घडले?
झाडांना पाणी देण्यासाठी आलेल्या वॉटर टँकरचा ब्रेक फेलImage Credit source: TV9 Network
| Updated on: Apr 06, 2023 | 12:57 PM
Share

बाडमेर : राजस्थानमधील बाडमेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. ऑफिसवरुन घरी येत असताना तिघा भावांवर काळाने घाला घातला. रस्ते अपघातात तीन भावांचा दुःखद मृत्यू झाला आहे. तिघेही कामावरून गावी परतत होते. ते ज्या स्कॉर्पिओमधून येत होते ती पलटली आणि त्याच त्यांचा मृत्यू झाला. तिघेही एकमेकांचे चुलत भाऊ, मामे भाऊ आहेत. मृतांमधील एका भावाचा 22 मे रोजी विवाह होणार होता. त्याआधीच काळाने त्याच्यावर झडप घातली. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. तरुण मुलांच्या मृत्यूमुळे तिन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

बारमेर जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील महाबर रोडवर मंगळवारी रात्री ही घटना घडली. खंगारसिंग वंशीय कानसिंग, श्यामसिंग वारसाल सिंग आणि प्रेमसिंग वंशीय उम्मेद सिंग अशी तिघा भावांची नावे आहेत. हे तिघे स्कॉर्पिओमधून महाबर रोडवरील कार्यालयातून मिठडा गावात परतत होते.

गाडीचा टायर फुटल्याने अपघात

अन्नदानीच्या ढाण्याजवळ भरधाव स्कॉर्पिओचा टायर फुटल्याने गाडी अनियंत्रित होऊन पलटी झाली. वाहन पलटी झाल्याने त्यात बसलेले तिघे भाऊ गंभीर जखमी झाले. यात खंगारसिंग आणि श्याम सिंग यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रेमसिंगचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. घटनास्थळाजवळून चालेल्या लोकांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली.

दोघांचा जागीच मृत्यू, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर एका जखमीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे तिन्ही कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...