AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vice President Election : विश्वासात घेतलं नाही म्हणून तृणमूल नाराज; उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होणार नाही

पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी पक्षाच्या बैठकीनंतर सांगितले, की पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते 21 जुलैच्या सभेत व्यस्त होते. पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक गुरुवारी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली झाली.

Vice President Election : विश्वासात घेतलं नाही म्हणून तृणमूल नाराज; उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होणार नाही
जगदीप धनकर/ममता बॅनर्जी/मार्गारेट अल्वाImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jul 21, 2022 | 6:15 PM
Share

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची तृणमूल काँग्रेस पार्टी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणार नाही. गुरुवारी कालीघाट येथील पक्ष कार्यालयात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीएने पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनकर (Jagdeep Dhankhar) यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेससह विरोधी पक्षांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांना जाहीर केली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीसाठी सक्रिय असलेल्या ममता बॅनर्जी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मात्र विरोधी पक्षांपासून पूर्णपणे अंतर ठेवून होत्या. दरम्यान, 6 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक (Vice President Election) होणार आहे. पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी गुरुवारी पक्षाच्या खासदारांसोबत बैठक घेणार आणि उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर निर्णय घेतला घेणार, असे तृणमूल काँग्रेसने आधीच जाहीर केले होते.

खासदारांच्या बैठकीत निर्णय

पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी पक्षाच्या बैठकीनंतर सांगितले, की पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते 21 जुलैच्या सभेत व्यस्त होते. पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक गुरुवारी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली झाली. या बैठकीत पक्षाचे 33 खासदार उपस्थित होते. पक्षाच्या बैठकीत सर्व खासदारांनी आपली मते मांडली.

‘विरोधी पक्षाची अवहेलना’

अभिषेक बॅनर्जी यावेळी म्हणाले, की राष्ट्रपतीपदाच्या बाबतीत एनडीएच्या उमेदवाराला कोणत्याही किंमतीत पाठिंबा देणार नाही. दुसरा निर्णय असा की मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देणे किंवा मतदानापासून दूर राहणे. उमेदवार जाहीर करताना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र ज्या पद्धतीने विरोधी पक्षाची अवहेलना झाली, त्यावरून या बैठकीला उपस्थित 85 टक्के खासदारांनी मत मांडले की या निवडणुकीपासून दूर राहायचे.

‘केवळ नातेसंबंधांच्या आधारे समर्थन नाही’

तृणमूल काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष आहे. ते किंवा सभापती एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत. 85 टक्के प्रतिनिधींनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारच मतदान करतात. म्हणून पक्षाच्या अध्यक्षांनी तो निर्णय खासदारांवर सोडला होता. त्यामुळेच खासदारांच्या मताने हा निर्णय घेण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांचे मार्गारेट अल्वा यांच्याशी चांगले संबंध आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु केवळ नातेसंबंधांच्या आधारे समर्थन करता येत नाही. ज्या प्रकारे एकतर्फी निर्णय घेण्यात आला. पक्षाच्या खासदारांनी यावर आक्षेप घेतला आहे, पण त्यामुळे विरोधी पक्षाच्या ऐक्याला तडा गेला असा होत नाही, असेही ते म्हणाले.

Follow Us
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...