AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रद्धेच्या आधारावर निर्णय घेतला तर पुराव्याचे काय होणार?- असदुद्दीन औवेसी

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी TV9 नेटवर्कच्या च्या वार्षिक कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाले. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपवर अयोध्या राम मंदिर आणि शेतकरी आंदोलनावरून निशाणा साधला.

श्रद्धेच्या आधारावर निर्णय घेतला तर पुराव्याचे काय होणार?- असदुद्दीन औवेसी
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 27, 2024 | 7:30 PM
Share

नवी दिल्ली | TV9 नेटवर्कच्या च्या वार्षिक कॉन्क्लेव्ह ‘What India Thinks Today’ च्या दुसऱ्या पर्वामध्ये एआयएमआयएम नेते आणि खासदार असदुद्दीन औवेसी यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना अयोध्या प्रकरणावर बोलताना श्रद्धेच्या आधारावर निर्णय घेतला तर पुराव्याचे काय होणार? असा सवाल केला. बाबरी मशिद पाडणाऱ्या एकाही आरोपीला शिक्षा झाली नसल्याचंही औवेसी यावेळी म्हणाले.

व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या ‘सत्ता संमेलन’मध्ये असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, देशातील सर्वात मोठ्या न्यायालयाने श्रद्धेच्या आधारावर निर्णय दिला आहे. श्रद्धेच्या आधारावर निर्णय घेतला तर पुराव्याचे काय होणार? राम मंदिराच्या निर्णयावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.  बाबरी मशिदीत मूर्ती ठेवल्या नसत्या तर 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचा कार्यक्रम झाला असता का? असा सवाल औवेसींनी केला.

आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, आम्ही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहोत. शेतकरी चळवळ ही बिगर राजकीय चळवळ आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन हे अराजकीय आंदोलन असल्याने त्यांच्या समर्थनार्थ आम्ही तिथे गेलो नाही. तिथे जाऊन आम्हाला वातावरण बिघडवायचे नाही, असं औवेसी शेतकरी आंदोलनावर बोलताना म्हणाले.

भाजपसोबत जुळवून घेऊन मी स्वतःवर हल्ला केला का? माझ्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या. माझ्या घरावर हल्ला झाला. लोकसभा निवडणुकीसाठी इतर पक्षांसोबत युती करण्याबाबत औवेसी म्हणाले की, होय, आम्ही नक्कीच युती करू. आम्ही अजूनही बोलत आहोत. याबाबत आम्ही सध्या कोणताही खुलासा करू शकत नाही. अनेक राज्यांमध्ये आमची चर्चा सुरू असल्याची माहिती औवेसी यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील यावर बोलताना नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, अशी माझी इच्छा नाही. मी स्वतःला पंतप्रधान होण्याचं स्वप्न कधीच पाहत नसल्याचं औवेसी  यांनी सांगितलं.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं