श्रीमद्भगवद्गीता, भरत मुनींचे नाट्यशास्त्रचा गौरव, युनेस्कोच्या ‘द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समावेश

भारताच्या संस्कृतीच्या वारशासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. श्रीमद्भगवद्गीता आणि भरत मुनींचे नाट्यशास्त्र आता युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये आले आहे. हा जागतिक सन्मान भारताच्या शाश्वत ज्ञानाचा आहे. या कलाकृती केवळ साहित्यिक खजिना नाही. त्यापेक्षा जास्त आहेत.

श्रीमद्भगवद्गीता, भरत मुनींचे नाट्यशास्त्रचा गौरव, युनेस्कोच्या द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश
Srimad Bhagwad Gita
| Updated on: Apr 18, 2025 | 1:48 PM

श्रीमद्भगवद्गीता आणि भरत मुनी यांच्या नाट्यशास्त्राचा गौरव झाला आहे. युनेस्कोच्या मेमोरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी याबाबत सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर माहिती दिली. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन करणारे ट्विट केले आहे. जगभरातील भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

गजेंद्र सिंह शेखावत यांच्या पोस्टवर ट्विट करताना पंतप्रधान मोदींनी लिहिले की, जगभरातील प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश करणे ही आपल्या शाश्वत ज्ञानाची आणि समृद्ध संस्कृतीला मिळालेली जागतिक मान्यता आहे. गीता आणि नाट्यशास्त्राने शतकानुशतके संस्कृती आणि चेतनेचे पोषण केले आहे. त्यांचे अंतर्दृष्टी जगाला प्रेरणा देत राहतात.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबद्दल पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिले की, भारताच्या संस्कृतीच्या वारशासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. श्रीमद्भगवद्गीता आणि भरत मुनींचे नाट्यशास्त्र आता युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये आले आहे. हा जागतिक सन्मान भारताच्या शाश्वत ज्ञानाचा आहे. या कलाकृती केवळ साहित्यिक खजिना नाही. त्यापेक्षा जास्त आहेत. त्या तात्विक आणि सौंदर्यात्मक कोनशिला आहेत. ज्यांनी भारताच्या जागतिक दृष्टिकोनाला आणि आपण ज्या पद्धतीने विचार करतो, अनुभवतो, जगतो आणि स्वतःला व्यक्त करतो त्याला आकार दिला आहे. आता आपल्या देशातील १४ नोंदी या आंतरराष्ट्रीय रजिस्टरमध्ये समाविष्ट झाल्या आहेत.

काय आहे युनेस्कोचे मेमोरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर?

युनेस्कोकडून मेमोरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर सुरु करण्यात आले आहे. त्याचे काम जगातील महत्वपूर्ण दस्तावेजाचे संरक्षण करणे आणि सामान्य जनतेपर्यंत ते पोहचवणे आहे. त्या माध्यमातून या दस्ताऐवजांची माहिती सर्व सामान्यांना सहज उपलब्ध होणार आहे. तसेच शंभर वर्ष हे दस्तावेज सुरक्षित ठेवणार आहे.

Follow Us