
भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. प्रत्येक जाती, धर्माच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत. संस्कृती देखील वेगळी आहे. प्रत्येक राज्याची आपली एक वेगळी संस्कृती आहे. भारताला मोठा प्राचीन वारसा लाभला आहे. भारतामध्ये असंख्य पर्यटनस्थळं आहेत. ही पर्यटनस्थळं नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरली आहेत. भारतात दरवर्षी लाखो विदेशी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. अनेक विदेशी पर्यटकांना भारतामधील संस्कृती भुरळ घालते, अनेक जण या संस्कृतीचा स्वीकार करतात. त्यातील काही जण तर भारतामध्येच कायमचं वास्तव्य करण्याचा निर्णय घेतात. अनेक जण तर असे आहेत, जे विदेशी नागरिक केवळ भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायचा म्हणून भारतात येतात.
दरम्यान जसं भारतातील संस्कृती ही इतर देशांपेक्षा युनिक आहे, तशीच इथली काही गाव देखील वेगळी आहेत. ही गावं आपल्या वेगळ्यापणामुळे चांगलीच चर्चेत आहेत. जसं की भारताच्या मध्य प्रदेश राज्यामध्ये एक गाव आहे. ज्याचं नाव शिवपुरी आहे. या गावात चक्क महिला लग्नासाठी करारावर मिळतात. त्यासाठी एक विशिष्ट भाडे करार केला जातो. हा भाडे करार 10 रुपयांपासून ते 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपवर केला जातो. या गावात विवाह इच्छूक तरुण दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
जसं शिवपुरी हे गाव भारतात प्रसिद्ध आहे, तसंच आणखी एक गाव भारतात प्रसिद्ध आहे. या गावाचं वैशिष्ट म्हणजे या गावात विदेशी महिला फक्त गर्भधारणेसाठी येतात. हे ऐकूण तुम्हाला थोडं विचित्र वाटेल मात्र हे खरं आहे. हे गाव लडाखमध्ये असून कारगिलपासून अवघ्या 70 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचं नाव आर्य व्हॅली आहे. या गावाचं वैशिष्ट म्हणजे इथे विदेशातील विषेत: युरोपातील महिला स्थानिक लोकांपासून गर्भधारणेसाठी येतात. त्याबदल्यात त्यांना या महिला पैसे देखील देतात.
नेमकं कारण काय?
या गावात ब्रोकपा जमातीचे लोक राहतात. या जमातीबद्दल असं म्हटलं जातं की हे लोक शुद्ध आर्य वंशाचे असून, ते अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्यांचे वंशज आहेत. आपल्या पोटी शुद्ध आर्य वशांचं मुलं जन्माला यावं अशी या महिलांची इच्छा असते. त्यामुळेच या महिला या गावात प्रेग्नन्सीसाठी येतात. येथील पुरुषांसोबतच्या संबंधांमधून त्या प्रेग्नंट होतात. त्या बदल्यात या महिला त्या पुरुषांना ते मागतील तेवढे पैसे देतात. दरवर्षी मोठ्या संख्येनं या महिला या गावात येत असतात.