AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! चेटकीण असल्याचा संशय, महिलेच्या घरावर अख्ख्या गावाचा हल्ला, 5 जणांना जिवंत जाळलं, जिल्ह्यातून हादरवणारी बातमी

धक्कादायक घटना समोर आली आहे, चेटकीण समजून गावातील 200 पेक्षा अधिक लोकांनी एका महिलेच्या कुटुंबावर हल्ला केला, या कुटुंबातील लोकांना पेट्रोल टाकून जीवंत जाळण्यात आलं आहे.

मोठी बातमी! चेटकीण असल्याचा संशय, महिलेच्या घरावर अख्ख्या गावाचा हल्ला, 5 जणांना जिवंत जाळलं, जिल्ह्यातून हादरवणारी बातमी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 07, 2025 | 6:54 PM
Share

बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच जण अंधश्रद्धेचे बळी ठरले आहेत. एका महिलेवर चेटकीण असल्याचा आरोप करत गावातील काही जणांनी हल्ला करून या महिलेसह तिच्या कुटुंबातील पाच जणांना जीवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

ही घटना बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातल्या मुफस्सिल पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या टेटगामा परिसरात घडली आहे. गावातील एक महिला चेटकीण असल्याचा संशय येथील ग्रामस्थांना होता, यातूनच ही खळबळजनक घटना घडली आहे. आधी या कुटुंबावर हल्ला करण्यात आला, त्यांना जबर मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना जीवंत पेटून देण्यात आलं, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये एकाच कुटुंबातील तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार याच गावात राहाणारी सीता देवी (48 वर्ष) ही महिला चेटकीण असल्याचा संशय गावातील लोकांना होता. त्यानंतर रविवारी गावचा प्रमुख असलेल्या नकुल उरांव यांच्या उपस्थितीमध्ये गावात एक बैठक बोलावण्यत आली, या बैठकीला दोनशे पेक्षा अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीसाठी सीता देवी त्यांचे पती बाबूलाल उरांव, सासू कांतो देवी, मुलगा मंजीत उरांव आणि सून रानी देवी यांना देखील बोलावण्यात आलं.

त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी काठ्यांनी या कुटुंबाला बेदम मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या या कुटुंबाला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्यात आलं. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुलगा मंजीत उरांव हा या जमावाच्या तावडीतून निसटल्यानं थोडक्यात बचावला आहे, त्याने या घटनेची माहिती पोलिसांनी दिली, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. दोन मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत, तिन मृतदेहांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत गावच्या प्रमुखाला आणि ट्रॅक्टर चालकाला अटक करण्यात आली आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Follow Us
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.
खरात फाईलमुळे महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकतं, संजय राऊतांचा मोठा दावा
खरात फाईलमुळे महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकतं, संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा.
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान.
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते.
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.