AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंध्र प्रदेशला मिळणार नवी राजधानी, अमरावती इतिहास जमा होणार

23 एप्रिल 2015 रोजी अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी घोषित करण्यात आली. त्यानंतर 2020 मध्ये राज्याच्या तीन राजधानींचे नियोजन करण्यात आले.

आंध्र प्रदेशला मिळणार नवी राजधानी, अमरावती इतिहास जमा होणार
वायएस जगन मोहन रेड्डीImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
| Updated on: Jan 31, 2023 | 3:31 PM
Share

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (Jagan Reddy) यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी राज्याची राजधानी बदलण्याचा (Andhra Pradesh Capital) निर्णय घेतला आहे. आता अमरावती नाही तर विशाखापट्टणम (Visakhapatnam)ही आंध्रप्रदेशची नवी राजधानी असणार आहे. त्यांनी नव्या राजधानीत ग्लोबल इन्व्हेस्टर समिट आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

सीएम रेड्डी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, ‘मी तुम्हाला विशाखापट्टणमला आमंत्रित करतो. विशाखापट्टणम येत्या काही दिवसांत आमची राजधानी बनणार आहे. येत्या काही महिन्यांतच मी विशाखापट्टणमलाही शिफ्ट होत आहे. ३ आणि ४ मार्चला विशाखापट्टणम येथे या शिखर परिषदेचे आयोजन करणार आहोत.

नऊ वर्षांपुर्वी तेलंगणा

तेलंगणापासून वेगळे झाल्यानंतर 23 एप्रिल 2015 रोजी अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी घोषित करण्यात आली. त्यानंतर 2020 मध्ये राज्याच्या तीन राजधानींचे नियोजन करण्यात आले. यामध्ये अमरावती, विशाखापट्टणम आणि कुर्नूल या शहरांचा समावेश आहे. मात्र, नंतर ती मागे घेण्यात आली आणि अमरावती ही राजधानी राहिली.

विशाखापट्टणमचे वैशिष्ट्ये

विशाखापट्टणम आंध्र प्रदेश राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. विशाखापट्टणम शहर आंध्र प्रदेशच्या ईशान्य भागात पूर्व घाट व बंगालच्या उपसागराच्या मध्ये वसले आहे. हे भारतामधील १७व्या क्रमांकाचे मोठे शहर होते. वॉल्टेअर आणि विशाखापट्टणम ही जुळी शहरे आहेत. वॉल्टेअर हे एक रेल्वे जंक्शन आहे. देशातील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचे बंदर विशाखापट्टणम आहे. भारतीय नौसेनेच्या ईस्टर्न नेव्हल कमांडचे मुख्यालय येथे आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.