AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येत्या 24 तासांत देशातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा, विदर्भात गारपीटीची शक्यता

गारपिटीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. खरीप पिके व भाजीपाला वाचविण्यासाठी शेतक्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. (Warning of heavy rains in the some part of country in the next 24 hours, hailstorm in Vidarbha)

येत्या 24 तासांत देशातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा, विदर्भात गारपीटीची शक्यता
मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
| Updated on: Apr 15, 2021 | 9:42 PM
Share

नवी दिल्ली : येत्या 24 तासांत देशातील बर्‍याच भागात हवामानातील मोठा बदल दिसून येईल. भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रानुसार, जम्मू-काश्मीर आणि लडाख येथे शुक्रवारी वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीसह 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि तेलंगणात एक-दोन ठिकाणी गारपीट होऊ शकते. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी पिकाची कापणी केली आहे त्यांनी आपले पीक सुरक्षित केले पाहिजे. गारपिटीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. खरीप पिके व भाजीपाला वाचविण्यासाठी शेतक्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. (Warning of heavy rains in the some part of country in the next 24 hours, hailstorm in Vidarbha maharashtra)

हवामान खात्याच्या माहितीनुसार, शुक्रवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये वातापरण स्वच्छ असेल. तापमानात घट झाल्यामुळे लोकांना उष्णतेपासून आराम मिळू शकेल. बिहारमध्ये वातावरण ढगाळ असेल. तथापि, पावसाची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर झारखंडमध्ये पुढील तीन दिवस म्हणजे 18 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे. राज्यातील बर्‍याच भागात धुळीच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

या राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

स्कायमेट वेदर रिपोर्टनुसार देशातील बर्‍याच राज्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, उत्तर आंतरिक कर्नाटक आणि केरळच्या बर्‍याच भागांत मुसळधार पाऊस पडेल. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण आणि पश्चिम मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडेल. पश्चिम हिमालयात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे, जो हळूहळू मुसळधार होऊ शकतो आणि 17 एप्रिलपर्यंत सुरू राहील.

या भागात जोरदार वारे वाहतील

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार आसाम व मेघालयातील काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारा वारे वाहू शकतात. हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, गंगा पश्चिम बंगाल, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा, तेलंगणा, तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल आणि केरळमधील काही ठिकाणी जोरदार वारे वाहू शकतील. पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, उप-हिमालय पश्चिम बंगाल, आणि सिक्कीम, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम, रॉयलसिमा, अरुणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, कर्नाटक आणि लक्षद्वीप येथे वीज पडण्याची भीती आहे. (Warning of heavy rains in the some part of country in the next 24 hours, hailstorm in Vidarbha maharashtra)

इतर बातम्या

Umar Khalid Bail | उमर खालीदला जामीन मंजूर, आरोग्य सेतू अ‌ॅप डाऊनलोड करणे बंधनकार

जामखेडच्या रुग्णालयातील उपचारपद्धती कोरोनावर फायदेशीर? विचार व्हावा, रोहित पवारांचं आवाहन

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.