AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IT सिटीत आंघोळीला पाणी नाही, कर्मचाऱ्यांचा कार्यालयात येण्यास नकार, कंपन्यांसमोर संकट

bengaluru water crisis | बंगळूर शहरातील 13,900 पैकी 6,900 बोअरमध्ये एक थेंबही पाणी नाही. हे बोअरवेल पूर्ण कोरडे पडले आहेत. यामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील पाच वर्षांत बंगळूरमधील 70% हिरवळ कमी झाली आहे.

IT सिटीत आंघोळीला पाणी नाही, कर्मचाऱ्यांचा कार्यालयात येण्यास नकार, कंपन्यांसमोर संकट
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 21, 2024 | 8:07 AM
Share

बंगळूर | 21 मार्च 2024 : भारतात काही शहरांची ओळख आयटी सिटी म्हणून झाली आहे. पुणे, बंगळूर, हैदराबाद ही शहर माहिती आणि तंत्रज्ञान नगरी म्हणून ओळखली जात आहे. यामधील बंगळूरमध्ये पाण्याची बिकट अवस्था झाली आहे. शहरात अंघोळीला नाही तर चेहरा धुण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर अन् लोकांना पाणी मिळत नाही. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास नकार दिला आहे. त्याचा परिणाम कंपन्यांच्या दैनंदिन कामावर होत आहे. कर्मचारी कार्यालयात येत नसल्यामुळे कंपन्यांसमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. उद्योगांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

पाण्यासाठी रांगा

बंगळूर शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते. बंगळूरमध्ये विप्रो, इन्फोसिससारख्या दिग्गज आयटी कंपन्यांचे मुख्यालय आहे. परंतु रोज पाण्याचे संकट शहरात उभे राहिले आहे. सर्व परिसरात नळांमधून पाणी येत नाही. टँकरसाठी लांबच्या लांब रांगा दिसत आहेत. शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढल्यामुळे शहरात पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. तसेच गेल्या काही वर्षांत शहरात पाऊस पुरेसा झालेला नाही. या सर्व बाबींचा परिणाम पाण्यावर झाला आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ

सोशल मीडियावर बंगळूरमधील पाण्याची गंभीरता दाखवणारे अनेक व्हिडिओ आले आहे. पाणी नसल्यामुळे पाण्याचे रेशन झाले आहे. गृहनिर्माण संस्थांनी पाण्यासंदर्भात एडवाइजरी जारी केली आहे. पाणी मिळवण्यासाठी लोक कामे सोडून रांगेत उभे राहत आहे. यामुळे कार्यालयात येण्यास कर्मचारी नकार देत आहेत. यामुळे कंपन्यांना पुन्हा रिमोट वर्किंग सुरु करावे लागले आहे.

बंगळूर शहरातील 13,900 पैकी 6,900 बोअरमध्ये एक थेंबही पाणी नाही. हे बोअरवेल पूर्ण कोरडे पडले आहे. यामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील पाच वर्षांत बंगळूरमधील 70% हिरवळ कमी झाली आहे. अजून चार दिवस शहरातील पाण्याची अशीच परिस्थिती राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

Follow Us
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली