AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IT सिटीत आंघोळीला पाणी नाही, कर्मचाऱ्यांचा कार्यालयात येण्यास नकार, कंपन्यांसमोर संकट

bengaluru water crisis | बंगळूर शहरातील 13,900 पैकी 6,900 बोअरमध्ये एक थेंबही पाणी नाही. हे बोअरवेल पूर्ण कोरडे पडले आहेत. यामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील पाच वर्षांत बंगळूरमधील 70% हिरवळ कमी झाली आहे.

IT सिटीत आंघोळीला पाणी नाही, कर्मचाऱ्यांचा कार्यालयात येण्यास नकार, कंपन्यांसमोर संकट
| Updated on: Mar 21, 2024 | 8:07 AM
Share

बंगळूर | 21 मार्च 2024 : भारतात काही शहरांची ओळख आयटी सिटी म्हणून झाली आहे. पुणे, बंगळूर, हैदराबाद ही शहर माहिती आणि तंत्रज्ञान नगरी म्हणून ओळखली जात आहे. यामधील बंगळूरमध्ये पाण्याची बिकट अवस्था झाली आहे. शहरात अंघोळीला नाही तर चेहरा धुण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर अन् लोकांना पाणी मिळत नाही. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास नकार दिला आहे. त्याचा परिणाम कंपन्यांच्या दैनंदिन कामावर होत आहे. कर्मचारी कार्यालयात येत नसल्यामुळे कंपन्यांसमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. उद्योगांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

पाण्यासाठी रांगा

बंगळूर शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते. बंगळूरमध्ये विप्रो, इन्फोसिससारख्या दिग्गज आयटी कंपन्यांचे मुख्यालय आहे. परंतु रोज पाण्याचे संकट शहरात उभे राहिले आहे. सर्व परिसरात नळांमधून पाणी येत नाही. टँकरसाठी लांबच्या लांब रांगा दिसत आहेत. शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढल्यामुळे शहरात पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. तसेच गेल्या काही वर्षांत शहरात पाऊस पुरेसा झालेला नाही. या सर्व बाबींचा परिणाम पाण्यावर झाला आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ

सोशल मीडियावर बंगळूरमधील पाण्याची गंभीरता दाखवणारे अनेक व्हिडिओ आले आहे. पाणी नसल्यामुळे पाण्याचे रेशन झाले आहे. गृहनिर्माण संस्थांनी पाण्यासंदर्भात एडवाइजरी जारी केली आहे. पाणी मिळवण्यासाठी लोक कामे सोडून रांगेत उभे राहत आहे. यामुळे कार्यालयात येण्यास कर्मचारी नकार देत आहेत. यामुळे कंपन्यांना पुन्हा रिमोट वर्किंग सुरु करावे लागले आहे.

बंगळूर शहरातील 13,900 पैकी 6,900 बोअरमध्ये एक थेंबही पाणी नाही. हे बोअरवेल पूर्ण कोरडे पडले आहे. यामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील पाच वर्षांत बंगळूरमधील 70% हिरवळ कमी झाली आहे. अजून चार दिवस शहरातील पाण्याची अशीच परिस्थिती राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

Follow Us
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले.
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय....
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय.....
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक.
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक...
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक....
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय.
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली...
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली....
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता.
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार...
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार....
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय.
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर...
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर....