Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ!

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. लोकांनी त्यांच्या ममता बॅनर्जी यांच्या गाडीवर चिखल आणि चप्पल, बूट फेकले आहेत.

Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ!
mamata banerjee convoy attack
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 09, 2026 | 3:57 PM

Mamata Banerjee Convoy Attack : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नेहमीच चर्चेत असतात. हातातून सत्ता गेल्यानंतर त्यांच्या पक्षाला मोठी गळती लागली आहे. अनेक खासदार, आमदारांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे पक्षात पुन्हा एकदा नवसंजीवनी यावी यासाठी त्या राज्यभर फिरत आहेत. लोकांशी, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर 24 परगना जिल्ह्यातील हलिशहर येथे दौऱ्यावर असताना बॅनर्जी यांच्या ताफ्यावर लोकांनी हल्ला केला आहे. त्यांच्या कारवर बूट भिरकावण्यात आले आहेत. सोबतच त्यांच्या कारच्या दिशेने चिखलफेकही झाली आहे. या घटनेनंतर बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी आज (9 ऑगस्ट) उत्तर 24 परगना येथील हलिशहर येथे गेला होत्या. यावेळी त्यांच्या ताफ्यावर लोकांनी हल्ला केला. हलिशहर या भागात तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. याच कार्यकर्त्याच्या कुटुंबियांची ममता बॅनर्जी भेट घ्यायला गेल्या होत्या. त्याच वेळी संतापलेल्या गर्दीने बॅनर्जी यांना मध्येच आडवले आणि यांच्या ताफ्यावरच हल्ला केला.

बॅनर्जी यांच्याविरोधात नारेबाजी

लोकांच्या गर्दीने ममता बॅनर्जी यांच्या गाडीला चारही बाजूंनी घेरलं. जमलेल्या लोकांनी त्यांच्या गाडीवर चिखलफेक केली. तसेच पाण्याच्या बॉटल, चप्पलही ममता बॅनर्जींच्या गाडीवर भिरकावण्यात आल्या. यावेळी संतापलेल्या लोकांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात नारेबाजी केली. लोकांची आक्रमकता पाहून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि लोकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवले. लगेच ममता बॅनर्जी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, या हल्ल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या आयुष्यात अशा प्रकारचा हल्ला मी कधीच पाहिला नाही. पोलिसांच्या संरक्षणात हे सगळं झालं. पोलीस भाजपाच्या लोकांना संरक्षण देतात, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. त्यामुळे आता या प्रकरणी पश्चिम बंगाल सरकार नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us