AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम आग नव्हे ऊर्जा, वाद नव्हे उत्तर, काही लोकांनी आता विचार बदलायला हवा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टोलेबाजी

22 जानेवारी 2024 ही केवळ कॅलेंडरची तारीख नाही, नवीन कालचक्रचा उगम आहे. संपूर्ण देशात उमंग आणि उत्साह वाढत आहे. देशवासियांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला आहे. गुलामी की मानसिक आपण सोडत आहोत. आजपासून हजार वर्षांनंतरही आज की तारीख की आणि क्षण विसरणार नाहीत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

राम आग नव्हे ऊर्जा, वाद नव्हे उत्तर, काही लोकांनी आता विचार बदलायला हवा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टोलेबाजी
narendra modi in ayodhyaImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jan 22, 2024 | 3:45 PM
Share

अयोध्या | 22 जानेवारी 2024 : राम जन्मभूमीत प्रभू रामलल्ला विराजमान झाले आहेत. या क्षणाची पाचशे वर्षे वाट पाहीली जात होती. राम मंदिराच्या उभारणीचा क्षणाने प्रत्येक भारतीयांमध्ये उत्साह संचारला आहे. या हा क्षण कायम लोकांच्या स्मरणात राहील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर म्हटले आहे. आज क्षण भारतीय समाजाच्या परिपक्वतेचा बोध आहे. आजचा क्षण केवळ विजयाचा नाही कर विनयाचा देखील असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. काही लोकांना राम मंदिर बनले तर आग लागेल असे वाटत होते, परंतू या लोकांना भारतीय लोकांच्या सामाजिक भावाची पवित्रता माहीती नव्हती असे मोदी यांनी यावेळी सांगितले.

अयोध्येत श्री राम मंदिरात रामल्लाची प्रतिष्ठापना झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नयनरम्य सोहळा झाला. या सोहळ्यात भाषण करताना पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. आजचा क्षण भारतीय समाजाच्या परिपक्वतेचा बोध आहे. आजचा क्षण विजयाचा नाही तर विनयाचाही आहे. अनेक राष्ट्र इतिहासात गुरफुटून जातात. त्यांनी इतिहास उलगडताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यातून अडचणी आल्या. पण आपण इतिहासाची ही गाठ अत्यंत भावूकतेने सोडली आहे. आपलं भविष्य आपल्या भूतकाळापेक्षा अधिक सुंदर होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

राम आग नव्हे ऊर्जा आहेत…

राम मंदिर बनले तर आग लागेल असं काही लोक म्हणत होते. पण या लोकांना भारताच्या सामाजिक भावाची पवित्रता माहीतच नव्हती. रामलल्लाच्या मंदिराची निर्मिती सदभाव, समन्वयाचं प्रतीक आहे. भारतीय समाजाची एकरुपता आहे. हे नवनिर्माण आगीला नव्हे तर ऊर्जेला जन्म देत आहे, हे आपण पाहत आहोत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. हा क्षण भारतीय समाजाला उज्ज्वल भवितव्याकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. राम मंदिरानंतर आग लागेल असे म्हणणाऱ्या त्या लोकांना मी आवाहन करतो, या पुनर्विचार करा. राम आग नाही, राम ऊर्जा आहे. राम वाद नाही, समाधान आहे. राम फक्त आपले नाहीत, ते सर्वांचे आहे. राम फक्त वर्तमान नाही, राम अनंत काल आहेत असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.