AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टार्टअप ते फिनटेकपर्यंत अमूल, एसबीआयचे दिग्गज मांडणार बदलत्या भारतावर विचार

What India Thinks Today: टीव्ही 9 च्या जागतिक शिखर परिषदेची 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे'ची दुसरी आवृत्ती येणार आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक व्यक्ती एकाच मंचावर एकत्र येणार आहे. बिझनेस वर्ल्डबद्दल बोलायचे झाले तर अमूलच्या एमडीपासून ते एसबीआयच्या माजी चेअरमनपर्यंत सर्वजण या कार्यक्रमात येणार आहेत.

स्टार्टअप ते फिनटेकपर्यंत अमूल, एसबीआयचे दिग्गज मांडणार बदलत्या भारतावर विचार
अमूल आणि एसबीआयचे हे दिग्गज व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिटमध्ये बदलत्या भारतावर विचार मांडतील.
| Updated on: Feb 24, 2024 | 9:43 AM
Share

नवी दिल्ली : जगातील अनेक देश सध्या मंदीतून जात आहेत. या परिस्थिीत भारत हा झपाट्याने विकसित होणारा देश आहे. भारताच्या या यशामागे डिजिटल फायनान्स आणि फिनटेक क्षेत्राची मोठी भूमिका आहे. अमूलसारख्या कंपन्यांनी केवळ अर्थव्यवस्थेला चालना दिली नाही तर करोडो लोकांना रोजगारही दिला आहे. या परिस्थितीत या क्षेत्रांशी निगडित लोक भारताच्या भविष्याबद्दल काय विचार करतात? या प्रश्नाचे उत्तर देशातील नंबर-1 न्यूज नेटवर्क TV9 च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ परिषदेत मिळेल. अमूलचे एमडी जयेन मेहता आणि एसबीआयचे माजी अध्यक्ष आणि भारतपेचे विद्यमान अध्यक्ष रजनीश कुमार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

व्हॉट इंडिया थिंक्स टुडेची ही दुसरी आवृत्ती आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक व्यक्ती एकाच मंचावर एकत्र असतील. तसेच प्रसिद्ध उद्योजक भांडवलदार, सीए, सीईओ आणि कंपन्यांचे अध्यक्षही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

अमूलचे एमडी जयेन मेहता?

अमूल ब्रँडचे मूल्य ६१ हजार कोटींहून अधिक आहे, जे गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाकडे आहे. जयेन मेहता यांनी जेव्हा कंपनीचे एमडी म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आणि विक्री हा कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे, परंतु कंपनीच्या वाढीसाठी आता ते नॉन-डेअरी व्यवसायावरही लक्ष केंद्रित करणार आहेत.

1991 मध्ये जयेन मेहता पहिल्यांदा अमूलशी जोडले गेले. त्यांनी ब्रँड मॅनेजर, ग्रुप प्रॉडक्ट मॅनेजर आणि जनरल मॅनेजर म्हणून काम केले. जयन मेहता यांनी एप्रिल-सप्टेंबर 2018 पर्यंत अमूल डेअरीचे एमडी प्रभारी म्हणूनही काम केले आहे. या परिषदेत जयेन भारताच्या स्टार्टअप इंडियाला टिकवून ठेवण्यासाठी आणि विकसित करण्याबद्दल बोलतील.

भारत पे चे अध्यक्ष रजनीश कुमार?

एकेकाळी देशातील खासगी क्षेत्रातील पाचव्या क्रमांकाची बँक असलेली येस बँक गंभीर संकटात सापडली होती. त्यावेळी तिला बाहेर काढण्याची जबाबदारी एसबीआयच्या रजनीश कुमार यांच्यावर देण्यात आली होती. त्याचा निकालही त्यांनी दिला. ते एसबीआयचे अध्यक्षही राहिले आहेत. सध्या ते भारत पे चे अध्यक्ष आहेत. रजनीश कुमार यांना बँकिंग क्षेत्रातील 40 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी क्रेडिट, प्रोजेक्ट फायनान्स, परकीय चलन आणि रिटेल बँकिंगशी संबंधित काम हाताळले आहे. YONO ॲप देखील त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले होते. TV9 च्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे कॉन्फरन्समध्ये, ते बँकिंग क्षेत्राच्या वाढीवर आणि भारतातील बदललेल्या फिनटेक परिस्थितीवर आपले विचार मांडतील.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.