AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मक्का करार भारतासाठी धोकादायक का ठरू शकतो? जाणून घ्या

सध्या मक्का करार चांगलाच चर्चेमध्ये आला आहे. सात ऑगस्ट रोजी सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कस्थान या तीन देशांनी मक्का येथे एका संयुक्त संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार या तीन देशांपैकी एकावर जरी हल्ला झाला तर तो या करारामध्ये सहभागी असलेल्या इतरही देशांवर हल्ला मानला जाणार आहे.

मक्का करार भारतासाठी धोकादायक का ठरू शकतो? जाणून घ्या
Mecca AgreementImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 8:45 PM
Share

सध्या मक्का करार चांगलाच चर्चेमध्ये आला आहे. सात ऑगस्ट रोजी सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कस्थान या तीन देशांनी मक्का येथे एका संयुक्त संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार या तीन देशांपैकी एकावर जरी हल्ला झाला तर तो या करारामध्ये सहभागी असलेल्या इतरही देशांवर हल्ला मानला जाणार आहे. या कराराला नाटो देशांमध्ये जो नियम आहे, तोच नियम लागू करण्यात आला आहे. सुरुवातीला जरी हा फक्त काही मुस्लिम देशांमध्ये झालेला एक साधा करार वाटत असला तरी देखील या मक्का करारामुळे भारताची चिंता वाढण्याची शक्यता आहे. सुरुवातीला या करारामध्ये फक्त तीन देश सहभागी झाले आहेत. मात्र लवकरच या कराराची व्याप्ती वाढण्याचे संकेत मिळत आहेत. भारताचा शेजारी देश असलेल्या बांग्लादेशने देखील या करारामध्ये सहभागासाठी उत्सुकता दाखवली आहे. हा भारतासाठी डोकेदुखीचा विषय ठरू शकतो.

सात ऑगस्ट रोजी सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कस्थान या तीन देशांमध्ये हा करार झाला, परंतु आता याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. या करारामध्ये पश्चिमेकडील जवळपास सर्वच मुस्लिम देश सहभागी होऊ शकतात. जसं की, कतार, कुवैत, बहरीन, जॉर्डन, मिस्त्र, या देशांसोबत एक डझन पेक्षा अधिक देश या करारामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानसोबतच बांग्लादेश देखील या करारामध्ये सहभागी होण्याची शक्यता असल्याने भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण यातील अनेक देशांसोबत भारताचे पूर्वीपासून व्यापारी संबंध आहेत.

बांग्लादेशमुळे टेन्शन वाढणार

दरम्यान या मक्का कारारामध्ये बांग्लादेश देखील सहभागी होण्यास उत्सुक आहे, एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे बांग्लादेश असं हे गणित आहे. बांग्लादेश हा भारताचा महत्त्वाचा ट्रेड पार्टनर आहे, भारताचा बांग्लादेशसोबतचा व्यापार हा 12-14 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणामुळे व्यापारामध्ये घट झाली आहे, मात्र तरी देखील बांग्लादेश हा भारताचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार देश आहे.

Follow Us
जरांगे एकनाथ शिंदेंचा माणूस, सदावर्तेंचा आरोप
Gunratna Sadavarte on Manoj Jarange : जरांगे एकनाथ शिंदेंचा माणूस, सदावर्तेंचा आरोप
एकदा निर्णय झाला तो झलाच! जरांगे पाटलांचे अंतरवाली सराटीत आंदोलन,
Manoj Jarange : एकदा निर्णय झाला तो झलाच! जरांगे पाटलांचे अंतरवाली सराटीत आंदोलन, मुंबईतही...
साखरेचे दर घसरले पण आता दूध महागणार; किती रुपयांची होणार वाढ?
Milk Price : साखरेचे दर घसरले पण आता दूध महागणार; किती रुपयांची होणार वाढ?
सर्वसामन्यासाठी आनंदाची बातमी! अखेर साखरेच्या दरात मोठी घसरण; किती...
सर्वसामन्यासाठी आनंदाची बातमी! अखेर साखरेच्या दरात मोठी घसरण; किती रुपयांनी घट  झाली?
CM मोटारीने आले म्हणून नाशकातील खड्डे... भर मंचावरून छगन भुजबळांचा...
CM मोटारीने आले म्हणून नाशकातील खड्डे... भर मंचावरून छगन भुजबळांचा महाजनांना टोला, नेमकं काय म्हणाले?
कैलास मानसरोवर यात्रेतील 37 भाविकांसाठी फडणवीसांचा पुढाकार
Nepal Flood : कैलास मानसरोवर यात्रेतील 37 भाविकांसाठी फडणवीसांचा पुढाकार
मोठी खळबळ! महायुतीत नाराजीचे सुर? सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी..
मोठी खळबळ! महायुतीत नाराजीचे सुर? प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी बदलताच... काय घडलं?
गणेशोत्सवाचे दहा दिवस मी पूर्णपणे... मुरलीधर मोहळ यांचं मोठं विधान
गणेशोत्सवाचे दहा दिवस मी पूर्णपणे... मुरलीधर मोहळ यांचे गणेश मंडळाबाबत मोठे विधान, नेमकं काय म्हणाले?
पुन्हा नाद करायचा... पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष तीव्र;
पुन्हा नाद करायचा... पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष तीव्र; संदीप वाघेरेंच्या बॅनरची तुफान चर्चा
नाशिकच्या शेती क्षेत्रातील क्रांती विलक्षण, फडणवीसांकडून शेतकऱ्यांचे..
नाशिकच्या शेती क्षेत्रातील क्रांती विलक्षण, फडणवीसांकडून शेतकऱ्यांचे कौतुक