AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात अंड्यांच्या किमतीत 30-40% घसरण, मध्यपूर्वेतील तणावाचा भारतीय बाजारावर परिणाम, 100 अंड्यांची किंमत फक्त…

मध्यपूर्वेतील संघर्षामुळे भारतीय बाजारावर देखील मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. याचा परिणाम अंड्यांच्या किमतीत झाला असून त्या थेट 30 ते 40 टक्क्याने घसरल्या आहेत.

भारतात अंड्यांच्या किमतीत 30-40% घसरण, मध्यपूर्वेतील तणावाचा भारतीय बाजारावर परिणाम, 100 अंड्यांची किंमत फक्त...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 17, 2026 | 1:42 PM
Share

देशभरात अंड्यांच्या किमतीत अचानक 30 ते 40 टक्क्यांची घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी व्यापाऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरत आहे. या बदलामागे स्थानिक कारण नसून मध्यपूर्वेतील वाढता भू-राजकीय तणाव हे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे.

सध्या भारतीय पोल्ट्री उद्योगासाठी परिस्थिती अस्थिर बनली आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे खाडी देशांकडे होणाऱ्या अंड्यांच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान निर्यात ठप्प झाल्याने मोठ्या प्रमाणात अंडी देशांतर्गत बाजारात उपलब्ध झाली असून त्याचा थेट परिणाम किमतींवर झाला आहे.

बाजारात अंड्यांची किंमत प्रतिअंडा सुमारे 7 रुपयांवरून घसरून 5 रुपयांपर्यंत आली आहे. म्हणजेच 100 अंडी सुमारे 500 रुपयांत उपलब्ध होत आहेत. किरकोळ बाजारातही अंड्यांच्या दरात घट झाली असून, पूर्वी 8 ते 9 रुपयांना विकले जाणारे अंडे आता 5.50 ते 6 रुपयांच्या दरम्यान मिळत आहे.

1 कोटी अंड्यांची निर्यात बंद

या घसरणीमागे मध्यपूर्वेतील वाढते तणावपूर्ण वातावरण कारणीभूत आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे आणि वाहतूक मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने संयुक्त अरब अमिरात, ओमान, कतार आणि बहरेन यांसारख्या देशांशी होणारा व्यापार मोठ्या प्रमाणात बंद झाला आहे.

उद्योगातील आकडेवारीनुसार, या संकटापूर्वी भारतातून खाडी देशांकडे दररोज सुमारे 1 कोटी अंड्यांची निर्यात केली जात होती. विशेष म्हणजे भारतातील एकूण निर्यातयोग्य अंड्यांपैकी जवळपास 80 टक्के अंडी ही केवळ खाडी देशांकडे पाठवली जात होती. मात्र सध्या निर्यात थांबल्यामुळे हा मोठा साठा देशांतर्गत बाजारात आणला जात आहे. ज्यामुळे पुरवठा मागणीपेक्षा जास्त झाला आहे.

सामान्य ग्राहकांना दिलासा

या परिस्थितीत व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत असला तरी सामान्य ग्राहकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. किमती कमी झाल्यामुळे अंड्यांची मागणी पुन्हा वाढू लागली आहे. महागाईमुळे अंडी खरेदी कमी केलेल्या अनेक कुटुंबांनी आता पुन्हा अंड्यांचा आहारात समावेश करण्यास सुरुवात केली आहे.

अंडे हे पोषणमूल्यांनी समृद्ध अन्न मानले जाते. ज्यामध्ये व्हिटॅमिन A, D, E, B12 यांसह आयर्न आणि सेलेनियम मोठ्या प्रमाणात असते. प्रति 100 ग्रॅम अंड्यामध्ये सुमारे 12.6 ग्रॅम प्रथिने आणि 155 कॅलरीज असतात. त्यामुळे ते संतुलित आणि किफायतशीर आहाराचा उत्तम पर्याय ठरते.

Follow Us
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...