AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 400 निष्पाप लोक ठार, भारताकडून थेट संताप, हे सहन..

काल रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागात मोठा हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात तब्बल 400 पेक्षा अधिक लोकांचा जीव गेल्याने मोठी खळबळ उडाली. यादरम्यानच आता यावर भारताने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 400 निष्पाप लोक ठार, भारताकडून थेट संताप, हे सहन..
Pakistan airstrikes on Afghanistan
| Updated on: Mar 17, 2026 | 1:35 PM
Share

रमजानच्या महिन्यात अफगाणिस्तानमध्ये मोठा तांडव बघायला मिळाला. पाकिस्तानकडून मोठा हवाई हल्ला काल रात्री करण्यात आला. दहशतवादी अड्डा समजून पाकिस्तानने एका रूग्णालयावर हल्ला केला. या हल्ल्यात 400 पेक्षाही अधिक निर्दाेष लोकांचा जीव गेला. हवाई हल्ल्यानंतर या इमारतीला मोठी आग लागली. अफगाणिस्तानकडून या हल्ल्याचा बदला घेण्याचा थेट मोठा इशारा देण्यात आला. कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणाव बघायला मिळत आहे. सतत एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. त्यामध्येच पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या 5 ठिकाणांना टार्गेट करून काल रात्री मोठे हल्ले केले. या हल्ल्यात तब्बल 400 पेक्षाही अधिक लोकांचा जीव गेला. कित्येक लोक गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्ताने केलेल्या या हवाई हल्ल्यानंतर भारताने पाकला खडेबोल सुनावले आहेत.

काबूलमध्ये पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर भारताने पहिली मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून या घटनेचा निषेध केला. या हल्ल्याला अमानवीय आणि निंदनीय असल्याचे भारताने म्हटले. हेच नाही तर आंतरराष्ट्रीय समुदायाने गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी देखील भारताकडून करण्यात आली. हे अजिबात सहन केले जाणार नसल्याचेही भारताने सांगितले.

या हल्ल्यावर बोलताना परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट शब्दात सांगितले की, रुग्णालय ही एक अशी संस्था होती जिला कोणत्याही परिस्थितीत लष्करी लक्ष्य मानले जाऊ शकत नाही. लष्कर कारवाई म्हणून विचित्र करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात असल्याचेही भारताने म्हटले आहे. अफगाणिस्तानमधून काही धक्कादायक व्हिडीओ पुढे येत आहेत, ज्याने खळबळ उडाली.

थेट रूग्णालयाची अख्खी इमारत आगीच्या कचाट्यात आली. पाच ठिकाणी हवाई हल्ले करण्यात आली. निवासी भागात पकिस्तानकडून हे हल्ले करण्यात आले. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली असून बदला घेण्याची भाषा केली जात आहे. मुळात म्हणजे मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर तणाव बघायला मिळत आहे. त्यामध्येच हा घातक हल्ला करण्यात आला.

Follow Us
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...