AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satta Sammelan | आम्हाला डिवचाल तर सोडणार नाही; राजनाथ सिंह यांचा थेट इशारा

भाजपमधील आयारामांवर राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुणी आमच्याशी दोस्ती करत असेल तर आम्ही त्यांना बाहेर का करावं? भाजपचा परिवार चांगला आहे, असं त्यांना वाटत असेल तर त्यांना कसं बाहेर काढणार? आम्ही काय कुणावर जबरदस्ती करत आहोत का? देशाला शिखरावर नेण्याचं काम मोदी सरकारचं करत आहे, म्हणून इतर लोक आमच्यासोबत येत आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.

Satta Sammelan | आम्हाला डिवचाल तर सोडणार नाही; राजनाथ सिंह यांचा थेट इशारा
rajnath singhImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 27, 2024 | 1:00 PM
Share

नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : आम्ही कुणाला डिवचणार नाही, आम्हाला डिवचलं तर आम्ही सोडणार नाही. ही आमची नीती आहे, असा इशारा देतानाच ज्याने कधीच कुठल्याही देशावर हल्ला केला, आक्रमण केलं नाही. शेजाऱ्याच्या एक इंच जागेवरही ताबा सांगितला नाही, असा भारत जगातला एकमेव देश आहे. याबाबत भारतावर कुणीही बोट ठेवू शकत नाही, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या ग्लोबल समीटमध्ये बोलत असताना राजनाथ सिंह यांनी हा इशारा दिला. यावेळी त्यांनी देशाच्या परराष्ट्र नीतीवरही भाष्य केलं.

पीओकेची चिंता करू नका. तिथले लोकच भारतात येण्याची मागणी करतील. दीड वर्षापूर्वी काश्मीर व्हॅलीत माझा कार्यक्रम होता. तेव्हाच मी तिथल्या जनतेला संबोधित केलं होतं. पाकिस्तान व्याप्त काश्मीरचे लोक भारतात यायला उत्सुक होतील, असं मी म्हटलं होतं. तिथले लोक भारतात यायला उत्सुक आहेत. या पुढे काय काय होतं ते पाहा, असं सूचक विधान राजनाथ सिंह यांनी केलं. तसेच शांततेच्या काळातही कोणत्याही स्वाभिमानी देशाच्या सैन्याला तयार राहिलं पाहिजे. कुणावर आक्रमण करण्यासाठी नव्हे तर आपल्या संरक्षणासाठी ही तयारी असली पाहिजे, अशा सूचना लष्कराला दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

झुकून चर्चा नाही

चीनसोबत चांगली चर्चा सुरू आहे. चिंतेचं कारण नाही. सार्वजनिकरित्या काही गोष्टी स्पष्ट केल्या जात नाहीत. चीनशी चर्चा करताना ही चर्चा झुकून केली जात नाही, एवढं समजून जा. देशाचं मस्तक कोणत्याही परिस्थितीत आम्ही झुकू देणार नाही. चीन आमच्यासोबत चर्चेला तयार आहेत. म्हणून आम्ही चर्चा करत आहोत. आम्ही कमजोर आहोत असं नाही. आम्ही चर्चेसाठी चीनला जबरदस्ती केली नाही. त्यांनीही केली नाही. ते आमच्याशी चर्चा करतात यातच सर्व काही समजून जा. आता समजून जा काही ना काही आहे. ते काय आहे हे सांगणार नाही, असं सूचक विधानही राजनाथ सिंह यांनी केलं.

राहुल गांधींनी आश्वस्त राहावं

चीनने भारताच्या भूभागावर अतिक्रमण केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपालाही त्यांनी उत्तर दिलं. भारताच्या जमिनीवर चीनने कंन्स्ट्रक्शन कधी केलंय केव्हा केलंय मला माहीत नाही. ते राहुल गांधी यांनाच माहीत असेल. आपल्या सैन्याच्या पराक्रमावर त्यांनी शंका उपस्थित करू नये. देशाचं मस्तक कधीच झुकू देणार नाही, याबाबत राहुल गांधी यांनी आश्वस्त राहावं. चीन जर त्यांच्या देशात बांधकाम करत असेल तर आम्ही का रोखावं? असा सवालही त्यांनी केला.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं