AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satta Sammelan | आम्हाला डिवचाल तर सोडणार नाही; राजनाथ सिंह यांचा थेट इशारा

भाजपमधील आयारामांवर राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुणी आमच्याशी दोस्ती करत असेल तर आम्ही त्यांना बाहेर का करावं? भाजपचा परिवार चांगला आहे, असं त्यांना वाटत असेल तर त्यांना कसं बाहेर काढणार? आम्ही काय कुणावर जबरदस्ती करत आहोत का? देशाला शिखरावर नेण्याचं काम मोदी सरकारचं करत आहे, म्हणून इतर लोक आमच्यासोबत येत आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.

Satta Sammelan | आम्हाला डिवचाल तर सोडणार नाही; राजनाथ सिंह यांचा थेट इशारा
rajnath singhImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 27, 2024 | 1:00 PM
Share

नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : आम्ही कुणाला डिवचणार नाही, आम्हाला डिवचलं तर आम्ही सोडणार नाही. ही आमची नीती आहे, असा इशारा देतानाच ज्याने कधीच कुठल्याही देशावर हल्ला केला, आक्रमण केलं नाही. शेजाऱ्याच्या एक इंच जागेवरही ताबा सांगितला नाही, असा भारत जगातला एकमेव देश आहे. याबाबत भारतावर कुणीही बोट ठेवू शकत नाही, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या ग्लोबल समीटमध्ये बोलत असताना राजनाथ सिंह यांनी हा इशारा दिला. यावेळी त्यांनी देशाच्या परराष्ट्र नीतीवरही भाष्य केलं.

पीओकेची चिंता करू नका. तिथले लोकच भारतात येण्याची मागणी करतील. दीड वर्षापूर्वी काश्मीर व्हॅलीत माझा कार्यक्रम होता. तेव्हाच मी तिथल्या जनतेला संबोधित केलं होतं. पाकिस्तान व्याप्त काश्मीरचे लोक भारतात यायला उत्सुक होतील, असं मी म्हटलं होतं. तिथले लोक भारतात यायला उत्सुक आहेत. या पुढे काय काय होतं ते पाहा, असं सूचक विधान राजनाथ सिंह यांनी केलं. तसेच शांततेच्या काळातही कोणत्याही स्वाभिमानी देशाच्या सैन्याला तयार राहिलं पाहिजे. कुणावर आक्रमण करण्यासाठी नव्हे तर आपल्या संरक्षणासाठी ही तयारी असली पाहिजे, अशा सूचना लष्कराला दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

झुकून चर्चा नाही

चीनसोबत चांगली चर्चा सुरू आहे. चिंतेचं कारण नाही. सार्वजनिकरित्या काही गोष्टी स्पष्ट केल्या जात नाहीत. चीनशी चर्चा करताना ही चर्चा झुकून केली जात नाही, एवढं समजून जा. देशाचं मस्तक कोणत्याही परिस्थितीत आम्ही झुकू देणार नाही. चीन आमच्यासोबत चर्चेला तयार आहेत. म्हणून आम्ही चर्चा करत आहोत. आम्ही कमजोर आहोत असं नाही. आम्ही चर्चेसाठी चीनला जबरदस्ती केली नाही. त्यांनीही केली नाही. ते आमच्याशी चर्चा करतात यातच सर्व काही समजून जा. आता समजून जा काही ना काही आहे. ते काय आहे हे सांगणार नाही, असं सूचक विधानही राजनाथ सिंह यांनी केलं.

राहुल गांधींनी आश्वस्त राहावं

चीनने भारताच्या भूभागावर अतिक्रमण केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपालाही त्यांनी उत्तर दिलं. भारताच्या जमिनीवर चीनने कंन्स्ट्रक्शन कधी केलंय केव्हा केलंय मला माहीत नाही. ते राहुल गांधी यांनाच माहीत असेल. आपल्या सैन्याच्या पराक्रमावर त्यांनी शंका उपस्थित करू नये. देशाचं मस्तक कधीच झुकू देणार नाही, याबाबत राहुल गांधी यांनी आश्वस्त राहावं. चीन जर त्यांच्या देशात बांधकाम करत असेल तर आम्ही का रोखावं? असा सवालही त्यांनी केला.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!