AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बागेश्वर बाबाच्या दरबारात गेलेला नवरा परतलाच नाही, सर्व भक्तांना विचारलं; महिलेला रडू अवरेना…

बागेश्वर बाबा यांच्या दरबारातून एक शिक्षक गायब झाला आहे. चार महिने झाला तरी तो सापडलेला नाही. त्यामुळे या महिलेने शेवटी राज्याच्या एका मंत्र्याकडे धाव घेतली आहे.

बागेश्वर बाबाच्या दरबारात गेलेला नवरा परतलाच नाही, सर्व भक्तांना विचारलं; महिलेला रडू अवरेना...
Baba BageshwarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 21, 2023 | 6:20 AM
Share

पटणा : बागेश्वर बाबा ऊर्फ पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारातून आलेल्या एका महिलेने गंभीर आरोप केला आहे. बागेश्वर बाबांच्या दरबारात गेलेला आपला नवरा परतलेलाच नसल्याचा दावा या महिलेने केला आहे. चार महिन्यापूर्वी तिचा नवरा बागेश्वर बाबांच्या दरबारात गेला होता. तो अजून परतला नाही. चार महिन्यानंतरही नवरा न आल्याने तिने बागेश्वर बाबांच्या दरबारात धाव घेतली. तिथल्या अनेक भक्तांकडे विचारणा केली. पण कुणालाच तिच्या नवऱ्याचा थांगपत्ता नाहीये. त्यामुळे ही महिला अक्षरश: केविलवाणी झाली. तिला रडू अवरेनासं झालं.

ललन कुमार असं या महिलेच्या नवऱ्याचं नाव आहे. तो 36 वर्षाचा असून पेशाने शिक्षक आहे. तो दरभंगा जिल्ह्यातील बहेडी प्रखंडच्या बघोनी गावातील वॉर्ड क्रमांक दोन येथील राहणारा आहे. चार महिन्यापूर्वी तो बागेश्वर बाबाच्या दरबारात गेला परत आलाच नाही. बागेश्वर बाब पटनाला येत असल्याचं माहीत पडल्यानंतर ही महिला तिच्या ननदेसोबत बाबाच्या दरबारात गेली. पण काहीच फायदा झाला नाही. या महिलेला बाबाशी भेटू दिलं नाही.

दोन दिवसात येतो म्हणाला…

नवऱ्याचा शोध घेणाऱ्या या महिलेचं नाव सविता कुमारी आहे. पतीची कुठेच माहिती मिळत नसल्याने या महिलेने राज्याचे मंत्री तेज प्रताप यादव यांच्याकडे धाव घेतली आहे. बागेश्वर बाबाच्या दरबारातून लोक का गायब होत आहेत? असा सवाल तिने केला आहे. माझा नवरा बागेश्वर धामला गेला होता. 6 फेब्रुवारीच्या 10 वाजल्यापासून त्याचा फोन बंद येत आहे. फोन बंद येण्यापूर्वी बागेश्वर बाबाचं दर्शन घेतल्याचं त्याने सांगितलं होतं. दोन दिवसात घरी येतो म्हणूनही त्याने सांगितलं होतं. पण चार महिने उलटले तरी तो आलेला नाही. त्याला वारंवार फोन लावला. पण त्याचा फोन बंद येत आहे. मी पतीची रोज वाट पाहत आहे, असं सविता कुमारीचं म्हणणं आहे.

कुंकुवाचं रक्षण करा

मी बागेश्वर बाबाच्या दरबारातील सर्व लोकांना माझे पती कुठे गेले याची माहिती देण्याचं आवाहन केलं. तुम्ही माझ्या कुंकुवाचं रक्षण करा असंही आवाहन केलं. बाबांच्या दरबारातून लोक का गायब होत आहेत? लोक का सापडत नाहीये, असं तिचं म्हणणं आहे.

आतापर्यंत 40 लोक गायब

मध्यप्रदेशातील बरैठा पोलीस ठाण्यातील रिपोर्टनुसार 1 जानेवारीपासून आतापर्यंत बाबाच्या दरबारातून 40 लोक गायब झाले आहे. त्यापैकी 28 लोक सापडले आहेत. लोक अचानक गायब का होत आहे? काय षडयंत्र रचलं जात आहे. मध्यप्रदेश सरकारने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. मी चार वेळा बाबाच्या दरबारात गेले. पण कोणीच माझं ऐकलं नाही, अशी व्यथाही या महिलेने व्यक्त केली आहे.

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.