मुंबई : नगर पंचायत निवडणुकीचे सर्व निकाल (Nagar Panchayat Election Result) आज लागले. महाराष्ट्राच्या शेवटचे टोक असलेल्या सिरोंचा नगरपंचायत इतर स्थानिक पक्ष असलेला आदिवासी विद्यार्थी संघटनेने एकतर्फी बाजू मारली. यात आदिवासी विद्यार्थी संघटनेचे दहा, राष्ट्रवादीचे पाच व शिवसेनेचे 2 असे उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 6 नगरपंचायतीत वर्चस्व स्थापन केला. कुरखेडा भाजप पक्षाने एकतर्फी सत्ता हासील केली. घराण्याची नगरी असलेली अहेरी नगरपंचायत त्रिशंकू निकाल लागलेला आहे. अहेरी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे मूळ गाव आहे. भाजप पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम (Amrish Atram) यांच्या मुळगाव अहेरीच आहे. पण हा राष्ट्रवादी किंवा भाजप पक्षाला इथे सत्ता असेल करता आलेली नाही. अहेरी नगरपंचायत पहिल्यांदाच आदिवासी विद्यार्थी संघटनेने पाच नगरसेवक जिंकून खाता उघडला.
काँग्रेसला सर्वाधिक 4 नगरपंचायती मिळाल्यात
भाजपकडे 2 नगरपंचायती आल्यात
राष्ट्रवादीच्या वाट्याला 1 नगरपंचायत आलीय
अपक्षांच्या हाती एक नगरपंचायत आलीय
एका भामरागडमध्ये त्रिशंकू परिस्थिती आहे.
धानोरा नगरपंचायत काँग्रेसनं एक हाती जिंकलीय.
काँग्रेसला 13 जागा
भाजपला 3
तर एका ठिकाणी अपक्ष निवडून आला
चार्मोशी नगरपंचायतीत काँग्रेसला 8 जागा मिळाल्या
राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या
भाजपला 3
तर एक जागा अपक्षाला मिळाली
काँग्रेसला स्पष्ट बहुमत नसलं तर अपक्ष किंवा राष्ट्रवादीच्या मदतीनं काँग्रेसची आरामात सत्ता येईल
कोरची नगरपंचायतीतही काँग्रेसला 8 जागा मिळाल्या
भाजपला 6 जागा मिळाल्यात
राष्ट्रवादी 1
आणि अपक्ष 2 ठिकाणी निवडून आलेत.
इथंही काँग्रेसला स्पष्ट बहुमत नसलं..तरी 2 अपक्ष असल्यानं काँग्रेसची सत्ता निश्चित आहे
एटापल्लीत काँग्रेसला 5 जागा मिळाल्यात
आदिवासी विकास आघाडीला 6 जागा आहेत
राष्ट्रवादी 3
आणि भाजपलाही 3 जागा मिळाल्यात
आदिवासी विकास आघाडी काँग्रेससोबत जाणार असल्यानं इथंही काँग्रेसचीच सत्ता येईल
भाजपनं 9 जागा मिळवल्यात
शिवसेनेला 5
तर काँग्रेसला 3 जागा मिळाल्यात
अहेरीत भाजपला 6 जागा मिळाल्यात
अपक्षही 6 आहेत
शिवसेनेला 2
तर राष्ट्रवादीला 3 जागा मिळाल्या
त्यामुळं अपक्ष इथं किंगमेकर असून, अपक्षांची साथ मिळाल्यास भाजपती सत्ता येईल शकते
अपक्षांना 10 जागा मिळाल्यात
राष्ट्रवादी 5
आणि शिवसेनेला 2 जागा मिळाल्यात
भाजपला 5 जागा मिळाल्या
राष्ट्रवादीला 3
काँग्रेस 2
आणि शिवसेनेला 1 जागा मिळाली
तर अपक्षांना 3 जागा मिळाल्या. त्यामुळं अपक्ष ज्यांच्या बाजूनं जातील त्यांची सत्ता येईल
मुलचेरा नगर पंचायतीत राष्ट्रवादीला 7 जागा मिळाल्या
अपक्षांकडे 5 जागा आहेत
शिवसेना 4
तर भाजपला 1 जागा मिळाली. त्यामुळं अपक्षांच्या मदतीनं राष्ट्रवादीची सत्ता आरामात येणार.
एकूणच गडचिरोलीतल्या 9 नगरपालिकांचा विचार केला तर, काँग्रेसचा दबदबा राहिलाय
राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरला असून राष्ट्रवादीकडे 28 नगरपंचायती आल्यात
दुसऱ्या स्थानी काँग्रेसनं झेप घेतलीय. काँग्रेसच्या ताब्यात 25 नगरपंचायती आल्यात
तिसऱ्या क्रमांकावर भाजप आहे…भाजपची 24 नगरपंचायतीत सत्ता आलीय
चौथ्या क्रमांकावर शिवसेना आहे…शिवसेनेकडे 17 नगरपंचायती आल्यात
तर इतरांच्या ताब्यात 12 नगरपंचायती आल्यात
भाजपचे 447 नगरसेवक आलेत
राष्ट्रवादीचे 400
काँग्रेसचे 346 सदस्य आलेत
इतरांचे 305 नगरसेवक आहेत
तर शिवसेनेचे 293 नगरसेवक आलेत
नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल पाहिला तर, राष्ट्रवादीचीच चांदी झालीय…मात्र चिंताजनक बाब ही शिवसेनेसाठी आहे…कारण शिवसेना चौथ्या आहे.
इतर बातम्या :