AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना निर्बंध : शाळा, महाविद्यालय, पर्यटनस्थळी कोरोना वाढतो! मग बाजारपेठांमध्ये कोरोना मरतो का?

महाराष्ट्रात दिवसा जमावबंदी आणि रात्रीचीही संचारबंदी आहे का? असा प्रश्न सध्या बाजारपेठांमधील दृश्यं पाहिल्यावर पडतो. विविध बाजारपेठांमध्ये खच्चून गर्दी आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून राज्यात कोरोना निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. पण विरोधाभास पाहा किती? जिथं गर्दी होते, त्या बाजारपेठांच्या ठिकाणी निर्बंध नाहीत आणि शाळा मात्र बंद, महाविद्यालयं बंद, पर्यटनस्थळंही बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. कारण काय तर कोरोना वाढणार.

कोरोना निर्बंध : शाळा, महाविद्यालय, पर्यटनस्थळी कोरोना वाढतो! मग बाजारपेठांमध्ये कोरोना मरतो का?
बाळू धानोरकर, उद्धव ठाकरे, अंबादास दानवे
| Edited By: | Updated on: Jan 12, 2022 | 10:37 PM
Share

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (Corona Outbreak) पाहता महाविकास आघाडी सरकारनं (Mahavikas Aghadi) राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावले आहेत. मात्र, हे निर्बंध फेब्रुवारीपर्यंत शिथील होतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) सांगितलं. मात्र सरकारला स्वपक्षीयांच्या नेत्यांनीच घरचा आहेर दिला आहे. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. मग पर्यटन स्थळं किमान 50 टक्क्यांच्या मर्यादेत सुरु का करत नाहीत ?, असा सवाल काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर आणि शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी केला आहे.

महाराष्ट्रात दिवसा जमावबंदी आणि रात्रीचीही संचारबंदी आहे का? असा प्रश्न सध्या बाजारपेठांमधील दृश्यं पाहिल्यावर पडतो. विविध बाजारपेठांमध्ये खच्चून गर्दी आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून राज्यात कोरोना निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. पण विरोधाभास पाहा किती? जिथं गर्दी होते, त्या बाजारपेठांच्या ठिकाणी निर्बंध नाहीत आणि शाळा मात्र बंद, महाविद्यालयं बंद, पर्यटनस्थळंही बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. कारण काय तर कोरोना वाढणार.

काँग्रेस खासदार, शिवसेना आमदारांचा सरकारला घरचा आहेर

शाळा, महाविद्यालये, पर्यटन स्थळावरुन कोरोना वाढतो. मग मार्केटमधल्या गर्दीमुळं कोरोना मरतो का ? त्यामुळंच चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकातील व्याघ्र प्रकल्प सुरु असताना ताडोबा पर्यटकांसाठी बंद का ? स्थानिक जिप्सी चालकांच्या रोजगाराचं काय ? असा सवाल धानोकर यांनी सरकारला केलाय. बाळू धानोकरांबरोबरच शिवसेने आमदार अंबादास दानवे यांनीही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था बिघडू नये म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळं खुले करण्याची मागणी दानवे यांनी या पत्रातून केली आहे.

‘शाळा, महाविद्यालये 50 टक्के क्षमतेनं सुरु करा’

पर्यटनस्थळांवर बंदी आणल्यानं, मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमधल्या व्यावसायिकांनाही मोठा फटका बसत आहे. पर्यटनाचे सर्व पॉईंट, तसंच महाबळेश्वरचा प्रसिद्ध वेण्णा लेक बोट क्लब बंद आहे. त्यामुळे व्यावसायिकांचं नुकसान होतंय. तर घोडे मालकांनाही मोठा आर्थिक फटका बसलाय. दुसरीकडे शाळा आणि महाविद्यालयंही सुरु करण्याची मागणी होतेय. रेस्टॉरंट, खासगी कार्यालय आणि सलून 50 टक्के क्षमतेनं सुरु आहेत. मग शाळा आणि महाविद्यालांनाही 50 टक्के क्षमतेनं सुरु करण्याची परवानगी द्या, अशी मागणी तज्ज्ञांनी केलीय.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळं पर्यटन बंद राहिले. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं. शाळा, महाविद्यालये बंद राहिल्यानं विद्यार्थ्यांचाही मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटला. त्यामुळं 50 टक्के उपस्थितीत पर्यटन स्थळं आणि शाळा, महाविद्यालयं कसे सुरु करता येईल, याचा सरकारनं विचार करणं गरजेचं बनलं आहे.

इतर बातम्या :

Video : फाळणीनं तोडलं… नियतीनं जोडलं! 74 वर्षांपूर्वी विभक्त झालेल्या भावांची गळाभेट म्हणूनच ऐतिहासिक आहे

Video | पर्रीकरांचा मुलगा आहे म्हणून उत्पलला भाजपची उमेदवारी नाही? फडणवीसांचं उत्तर जसच्या तसं

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.