कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचा ग्राऊंड रिपोर्ट, सविस्तर माहिती

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीत किती उमेदवारांनी अर्ज भरले सविस्तर माहिती

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचा ग्राऊंड रिपोर्ट, सविस्तर माहिती
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 12:27 AM

गेल्या अनेक दिवसापासून कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष होतं. मात्र काल अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता कसबा आणि चिंचवड मध्ये महाविकास आघाडी आणि भाजप दोन्हीकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता निवडणूक होणारच असे कुठेतरी चित्र निर्माण झाले अर्ज मागे घेण्यासाठी काही दिवस बाकी आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सातत्याने माध्यमातून विरोधकांना आवाहन करायचे की निवडणूक बिनविरोध करा. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे असे म्हणणे होते की ज्यावेळी आम्हाला निवडणूक बिनविरोध करायची होती राजू सातव यांच्या निधनानंतर त्यावेळी मी स्वतः महाविकास आघाडीच्या नेत्यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली की निवडणूक बिनविरोध करा.

भाजप फक्त माध्यमातून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती करत आहे. अद्याप त्यांच्याकडून कुठलाही फोन किंवा भेट घेण्याची तयारी दाखवण्यात आली नाही. त्यामुळे कुठेतरी आता निवडणूक होणारच असे चित्र निर्माण झाले आहेत कारण की राष्ट्रवादीकडून अजित पवार हे स्वतः निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्यांनी दोन्ही मतदारसंघात निवडणुकी संदर्भात चांगली तयारी केल्याचे दिसते. त्यामुळे आता दोन्ही मतदारसंघात कसबा आणि चिंचवड मध्ये निवडणूक होणारच असे चित्र आहे.

निवडणूक म्हटलं नाराजी नाट्य हे आलेच मग तो कोणताही पक्ष असो भाजप याला काही प्रमाणात अपवाद म्हणता येईल कारण की बंडखोरांना समज किंवा अन्य कुठल्या मार्गाने कसे शांत करायची किंवा बंडखोरी होऊ द्यायची नाही स्व पक्षामध्ये हे भाजपला चांगल्या प्रकारे जमते ) काल अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. कसल्या मध्ये भाजपकडून हेमंत रसाने यांना उमेदवारी जाहीर करून अर्ज दाखल करण्यात आला तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी अर्ज दाखल केला. हे अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसमध्ये मात्र बंडाळी चव्हाट्यावर आली.

कारण काँग्रेसचे पुण्यातील नेते दाभेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे आता त्यांची मनधरणी काँग्रेस नेते करणार का आणि ते आपला अपक्ष अर्ज मागे घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक दोघेही नाराज असल्याच्या चर्चा झाल्या. एवढीच काय तर शैलेश टिळक यांनी माध्यमासमोर आमच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी मिळायला हवी होती अशी नाराजी बोलून दाखवली. मात्र भाजपच्या नेत्यांनी त्वरित यावर ॲक्शन घेत नाराजी नाट्य शांत केले आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी टिळक कुटुंबाला फोन करून कामाला सुरुवात करा अशी विनंती केली त्यानंतर तत्काळ टिळकुटुंब प्रचारासाठी सहभागी झाले. काँग्रेसला मात्र अद्याप अंतर्गत बंडाळी शांत करता आली नाही.

कसब्यात किती उमेदवारांनी अर्ज भरले याची माहिती घेऊया – कसब्यात 29 उमेदवारानी 39 अर्ज भरले तर चिंचवड पोटनिडणुकीसाठी 40 जणांनी 53 उमेदवारी अर्ज भरले – कसबा आणि चिंचवड अपक्ष उमेदवार भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार. अपक्ष संख्या मोठी – 10 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत. – यावेळी दोन्ही पोटनिडणुकीत किती उमेदवार अर्ज मागे घेतात हे पाहणे महत्वाचे

कसबापेठ विधानसभा अर्ज भरलेले पक्ष – उमेदवार भाजपा – हेमंत रासने, काँग्रेस – रविंद्र धंगेकर, काँग्रेस बंडखोर – बाळासाहेब दाभेकर, संभाजी ब्रिगेड – अविनाश मोहिते, आप – किरण कदरे हिंदू महासंघ – आनंद दवे

वरील उमेदवारांनी कसबे मधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

कसबा मतदारसंघ हा ब्राह्मनांचा असल्याचे मानले जाते. कारण तब्बल पाच वेळा कसब्यातून भाजपचे गिरीश बापट ( ब्राम्हण ) निवडून आले. त्यांच्या विरोधातही काँग्रेस कडून रोहित टिळक (ब्राम्हण) यांनाच मैदानात उतरवले जात होते. तब्बल पाच वेळा कसबा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर जेव्हा गिरीश बापट हे खासदारकीला उभे राहिले त्यानंतर हा मतदारसंघ कोण लढवेल यावर चर्चा सुरू झाल्या. बापट आणि त्यानंतरही कसबा मतदारसंघ ब्राह्मणांच्या उमेदवारांच्या हाती असावा त्यामुळेच कदाचित पुण्याच्या तत्कालीन महापौर आणि दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांचे नाव पुढे करून त्यांना उमेदवारी दिली आणि निवडूनही आणले.

आता जेव्हा मुक्त टिळक यांचे निधन झाले आणि पोटनिवडणूक जाहीर झाली. कसबा मतदारसंघ हा ब्राह्मणांचा असल्याचं बोलल्या जाते त्यामुळे येथे ब्राह्मणच उमेदवार असेल असे एकंदरीत सर्वांना वाटले होते. मात्र भाजपने तसे न करता यावेळी ओबीसी कार्ड बाहेर करत ओबीसी समाजाचे राक्षे यांना उमेदवारी जाहीर केली. भाजपचे या निर्णयाला थोड्या प्रमाणात कुठेतरी विरोधी झाल्याचे बघायला मिळते. कारण कसब्यात ब्राह्मण समाजाकडून एक पोस्टर लावण्यात आले. त्यामध्ये ब्राह्मण नारज असल्याचं बोलल्या गेले.

(भाजपने मात्र त्याकडे दुर्लक्ष करत ओबीसी समाजाचा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता. कारण भाजपने कसब्यातून सर्वे केल्याचा समजते त्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या संदर्भात फार काही सहानुभूती असल्याचे समोर आले नाही त्यामुळे भाजपने ओबीसी उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे) तर दुसरीकडे काँग्रेसनेही सावध भूमिका घेत आधी भाजपला आपला उमेदवार घोषित करू दिला. त्यानंतरच त्यांनी उमेदवार दिला. कारण काँग्रेस पहिले चाचपणी करत होती की जर यांनी ब्राह्मण उमेदवार दिला तर आपणही ब्राह्मणच उमेदवार द्यायचा. त्यांनी जर शैलेश किंवा कुणाल टिळक यांना उमेदवारी जाहीर केली असती काँग्रेस रोहित टिळक यांना मैदानात उतरवत ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मण अशी लढत घडून आणण्याच्या तयारीत होती. मात्र भाजपने ओबीसींचा उमेदवार दिला त्यामुळे काँग्रेसने सावध पवित्रा घेत ओबीसींचाच उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवले त्यामुळे आता कसब्यात ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत होणार आहे.

कसबा हा ब्राह्मण समाज जास्त असणारा मतदारसंघ आहे का? कसब्यात आत्तापर्यंत ब्राह्मणांनी विधानसभेत नेतृत्व केले मात्र कसबे ची एकूण स्थिती बघितली तर कसबा खरंच ब्राह्मण मतदार जास्त असलेला मतदारसंघ आहे का ?असा प्रश्न पडतो कसबा मतदारसंघात जातीनिहाय गणित बघितले तर

* ब्राह्मण 13 टक्के असून त्यांची मतदारसंख्या ही 36 हजार 494 इतकी आहे.

* मराठा व कुणबी 23. 75 टक्के आहेत त्यांची मतदारसंख्या 65 हजार 690 इतकी आहे

* इतर मागासवर्ग 31.45 टक्के आहे त्यांची मतदारसंख्या 86 हजार 322 इतकी आहे

* अनुसूचित जाती 9.67 टक्के आहे. त्यांची मतदार संख्या 26 हजार 634 इतकी आहे.

* अनुसूचित जमाती 4.17 टक्के आहे. त्यांची मतदारसंख्या 11 हजार 485 इतकी आहे.

* मुस्लिम आणि जैन हे 17 टक्के आहेत. त्यांची मतदारसंख्या जवळपास 50 हजार आहे.

(वरील आकडेवारी एका सर्वेतून समोर आलेली आहे ) वरील सर्व आकडेवारी बघता ब्राह्मण वगळता कसब्यामध्ये मराठा आणि कुणबी समाजाचे मतदान अधिक आहे त्यामुळेच भाजपने येथे ओबीसी उमेदवार देण्याचे ठरवले असेल?

कसबा मतदारसंघात उमेदवारीवरून एवढ्या घडामोडी होत असताना दुसरीकडे मात्र चिंचवड मध्ये भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळते यावर मात्र सस्पेन्स ठेवण्यात आला. चिंचवड मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी मिळणार का ? किंवा दुसऱ्या उमेदवाराला मैदानात उतरवल्या जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. कारण स्वतः देवेंद्र फडणवीस यामध्ये जातीने लक्ष घालून होते. शेवटी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली. त्यांना उमेदवारी जाहीर होण्याच्या पहिले अश्विनी जगताप आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांचे नाव चर्चेत होते.

अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शंकर जगताप हे नाराज असल्याचे बातम्या आणि चर्चा झाली. मात्र भाजप आणि त्यांच्या नेत्यांनी कोणतेही बंड किंवा नाराजी नाट्य रंगू दिले नाही. तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जवळ आला तरी राष्ट्रवादीकडून उमेदवार ठरत नसल्याचे चित्र समोर आले. अजित पवार यांच्याकडून नाना काटे आणि राहुल कलाटे यांचे नाव चर्चेत होते.

अजितदादांनी अर्ज दाखल करायला काही वेळ शिल्लक असताना नाना काटे यांची उमेदवारी जाहीर केली. नाना काटे ना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर होताच राहुल कलाटे मात्र नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष म्हणून शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या शक्तिप्रदेशाने महाविकास आघाडीचे मात्र टेन्शन वाढल्याच दिसून येते. राहुल कलाटे हे जुने शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळ असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेते आणि स्वतः उद्धव ठाकरे त्यांना उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चिंचवड मध्ये मात्र मराठा विरुद्ध मराठा अशी लढत होताना दिसते. कारण अश्विनी जगताप भाजपच्या मराठा समाजाचे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादीचे नाना काटे सुद्धा मराठा समाजाचे आहेत दुसरीकडे अपक्ष म्हणून ज्या राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेही मराठा समाजाचे आहेत. त्यांनी जर उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर मात्र चिंचवडमध्ये मराठा विरुद्ध मराठा अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

चिंचवड मध्ये कोणी आणि किती उमेदवारी अर्ज दाखल झाले हे पाहूयात

-चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 40 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले आहेत – कल अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्यादिवशी 26 जणांनी अर्ज दाखल केले.

या अर्जांची 8 फेब्रुवारीला छाननी होणार आहे. तर, 10 फेब्रुवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे-चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 31 जानेवारी पासून अर्ज वाटप सुरु झाले

आजअखेरपर्यंत 128 जणांनी 231 अर्ज नेले. त्यापैकी 40 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये किती जणांचे अर्ज छाननीत बाद होतात. किती उमेदवार मागे घेतात आणि प्रत्यक्षात निवडणुकीत किती उमेदवार राहतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भाजपकडून अश्विनी जगताप, भाजपचे पर्यायी उमेदवार म्हणून शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून राहुल कलाटे यांनी अर्ज दाखल केला आहे. पण, त्यांनी एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे त्यांचा अपक्ष अर्ज राहील.

वरील सगळा आढावा बघता 10 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज माघे घेण्याची तारीख आहे. त्या तारखेला किती उमेदवार आपले अर्ज माघारी घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही उमेदवारांना सामना करावा लागत आहे सध्याचे चित्र एकंदरीत असे आहे. त्यामुळे कसब्यातून काँग्रेसचे दाभेकर आणि चिंचवड मधून राहुल कलाटे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे पाहणे महत्त्वाचे आहे. कसब्यामध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी तर चिंचवड मध्ये मराठा विरुद्ध मराठा अशी लढत होईल सध्या तरी असे चित्र आहे.

भाजप ज्याप्रमाणे निवडणूक बिनविरोध करा अशी विरोधकांना आवाहन करत आहे त्याकडे बघता दहा तारखेला विरोधक आपल्या उमेदवारांचे अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करतात का हे ही पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे.

-सुमित सरनाईक

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.