मुंबई: काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यापासून शिवसेनेच्या मागे शुक्लकाष्ठ लागलं आहे. शिवसेनेचे मंत्री अनिल परब, आमदार रवींद्र वायकर, प्रताप सरनाईक यांच्यापासून ते थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंवरही घोटाळ्याचे आरोप झाले आहेत. त्यातच शिवसेनेचे नेते रामदास कदम हेच सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा मनसे नेत्याने केला आहे. तर शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादीलाच घेरलं आहे. त्यामुळे शिवसेनेत ज्वालामुखी धुमसतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. (several senior sena leaders upset in shiv sena?, read what’s going in sena?)