ढगांशिवाय शूट करण्यात आलेलं पावसामधील हे गाणं, आजही गाणं प्रचंड सुपरहिट, कसं झालेलं शूट?

5 मिनिट 38 सेकंदाचं पावसातील गाणं, जे बिना ढगाळ वातावरणात करण्यात आले होते शूट. अनेक वर्षांनंतर नृत्यदिग्दर्शकाने गाण्याबाबतचा सांगितला किस्सा. आज हेच गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट.

| Updated on: Jun 20, 2026 | 12:38 PM
1 / 5
हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या लगान या चित्रपटातील ‘घनन घनन’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाबाबत दिवंगत नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे पुत्र आणि कोरिओग्राफर राजू खान यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात काही खास आठवणी सांगितल्या.

हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या लगान या चित्रपटातील ‘घनन घनन’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाबाबत दिवंगत नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे पुत्र आणि कोरिओग्राफर राजू खान यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात काही खास आठवणी सांगितल्या.

2 / 5
‘इंडियाज बेस्ट डान्सर 5’मध्ये सहभागी होताना राजू खान यांनी सांगितले की, ‘घनन घनन’ गाण्याचे चित्रीकरण त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण अनुभवांपैकी एक होते. या गाण्याची जबाबदारी मिळाल्यानंतर तयारीसाठी त्यांच्याकडे अत्यंत कमी वेळ होता. सेट पाहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शूटिंग सुरू होणार असल्याने संपूर्ण नियोजन एका रात्रीत करावे लागले.

‘इंडियाज बेस्ट डान्सर 5’मध्ये सहभागी होताना राजू खान यांनी सांगितले की, ‘घनन घनन’ गाण्याचे चित्रीकरण त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण अनुभवांपैकी एक होते. या गाण्याची जबाबदारी मिळाल्यानंतर तयारीसाठी त्यांच्याकडे अत्यंत कमी वेळ होता. सेट पाहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शूटिंग सुरू होणार असल्याने संपूर्ण नियोजन एका रात्रीत करावे लागले.

3 / 5
राजू खान यांनी सांगितले की, गाण्याच्या सुरुवातीच्या सीनमध्ये गावात दुष्काळ असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यानंतर गावकरी पावसाची आशा बाळगून आकाशाकडे पाहतात. मात्र प्रत्यक्ष चित्रीकरणावेळी हवामान पूर्णपणे वेगळे होते. गाण्यात ढगाळ वातावरण दाखवायचे होते, पण सेटवर प्रखर उन्ह होते. त्यामुळे पडणाऱ्या सावल्या लपवणे आणि ढगाळ वातावरणाची अनुभूती निर्माण करणे हे मोठे आव्हान बनले.

राजू खान यांनी सांगितले की, गाण्याच्या सुरुवातीच्या सीनमध्ये गावात दुष्काळ असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यानंतर गावकरी पावसाची आशा बाळगून आकाशाकडे पाहतात. मात्र प्रत्यक्ष चित्रीकरणावेळी हवामान पूर्णपणे वेगळे होते. गाण्यात ढगाळ वातावरण दाखवायचे होते, पण सेटवर प्रखर उन्ह होते. त्यामुळे पडणाऱ्या सावल्या लपवणे आणि ढगाळ वातावरणाची अनुभूती निर्माण करणे हे मोठे आव्हान बनले.

4 / 5
या समस्येवर मात करण्यासाठी चित्रपटाच्या टीमने विशेष नियोजन केले. अनेक सीनचे शूटिंग मर्यादित भागात करण्यात आले, जेणेकरून संपूर्ण सेट एकाच फ्रेममध्ये दिसणार नाही. तसेच कॅमेऱ्याचे कोन अशा पद्धतीने निवडले गेले की जमिनीवरील सावल्या प्रेक्षकांच्या नजरेत येऊ नयेत.

या समस्येवर मात करण्यासाठी चित्रपटाच्या टीमने विशेष नियोजन केले. अनेक सीनचे शूटिंग मर्यादित भागात करण्यात आले, जेणेकरून संपूर्ण सेट एकाच फ्रेममध्ये दिसणार नाही. तसेच कॅमेऱ्याचे कोन अशा पद्धतीने निवडले गेले की जमिनीवरील सावल्या प्रेक्षकांच्या नजरेत येऊ नयेत.

5 / 5
राजू खान यांच्या मते, गाण्याच्या दुसऱ्या भागातील बहुतांश शूटिंग सूर्यास्ताच्या वेळेत करण्यात आले. सूर्य मावळतीकडे झुकल्यानंतर उपलब्ध असलेल्या अवघ्या 40 ते 45 मिनिटांच्या नैसर्गिक प्रकाशात संपूर्ण टीम वेगाने काम करत असे. तो सीन पूर्ण केला.

राजू खान यांच्या मते, गाण्याच्या दुसऱ्या भागातील बहुतांश शूटिंग सूर्यास्ताच्या वेळेत करण्यात आले. सूर्य मावळतीकडे झुकल्यानंतर उपलब्ध असलेल्या अवघ्या 40 ते 45 मिनिटांच्या नैसर्गिक प्रकाशात संपूर्ण टीम वेगाने काम करत असे. तो सीन पूर्ण केला.

Follow Us