हृदय तुटलं की आजही लोक ऐकतात हे 51 वर्ष जुनं सुपरहिट गाणं, ऐकताच डोळ्यात येते पाणी
51 वर्षांपासून सर्वांचं आवडतं आहे हे गाणं. जेव्हा-जेव्हा नातं तुटते तेव्हा प्रत्येकाला येते या गाण्याची आठवण. आजही ऐकताना डोळ्यात येतात अश्रू.

जेव्हा एखाद्याचं मन तुटतं, तेव्हा शब्द अपुरे पडतात आणि अशा वेळी लोकांचा आधार बनतात ते म्हणजे दुःख भरी गाणी. नात्यांमधील तुटलेपण, अपूर्ण प्रेम आणि एकटेपणाची भावना या गाण्यांमधून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होते.

अशी गाणी ऐकल्यावर मनाला एक प्रकारचा दिलासा मिळतो आणि आपलं दुःख कुणीतरी समजून घेतंय, अशी जाणीव होते. याच संदर्भात आज आपण जवळपास 51 वर्षांपूर्वीचं एक अतिशय लोकप्रिय आणि भावनिक गाणं पाहणार आहोत.

‘दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा’. काळ लोटला तरी या गाण्याची जादू अजूनही कायम आहे. उलट, वेळ जसजसा पुढे जातो तसतसं या गाण्याचं भावनिक वजन अधिकच वाढलेलं दिसतं.

हे गाणं 1975 साली प्रदर्शित झालेल्या ‘अमानुष’ या चित्रपटातील आहे. या गाण्याला प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी आपल्या सुरेल आवाजात अमर केलं आहे. गाण्याचे संगीत श्यामलाल मित्रा यांनी दिलं असून, त्याचे हृदयस्पर्शी शब्द गीतकार इंदीवर यांनी लिहिले आहेत. गाण्याचे बोल इतके भावनिक आहेत की, एकांतात ऐकल्यास अनेकांच्या डोळ्यांत पाणी येतं.

‘दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा’ हे गाणं आजही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत असतं. अनेक लोक आपल्या आयुष्यातील अनुभव या गाण्याशी जोडतात आणि त्यामध्ये स्वतःची कहाणी पाहतात. त्यामुळेच हे गाणं काळाच्या पलीकडे जाऊन आजही तितकंच लोकप्रिय राहिलं आहे.