ते एव्हरग्रीन गाणे ऐकताच येते लता मंगेशकर यांची आठवण, पण गाण्याची खरी गायिकाच वेगळी
शम्मी कपूर-मुमताज यांचे एक एव्हरग्रीन गाणे आहे. हे गाणे ऐकताच लोकांना लता दिदींची आठवण येते. पण सत्य परिस्थिती फार वेगळी आहे. हे गाणे लता दिदींनी नाही तर दुसऱ्या एका गायिकेने गायले आहे.

गानकोकिळा लता मंगेशकर आज जरी आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांची एव्हरग्रीन गाणी आजही आपल्या हृदयात वसलेली आहेत. लतादिदींनंतर इंडस्ट्रीत अनेक दिग्गज गायिका आल्या, पण कोणालाही गानकोकिळा ही उपाधी मिळू शकली नाही. याच इंडस्ट्रीत एक अशी गायिकाही होती, जिची तुलना कायम लता मंगेशकर यांच्याशी करण्यात आली. गायिकेकडे गाण्यांच्या ऑफरही तेव्हाच येत असत, जेव्हा एखादा संगीत दिग्दर्शक लता मंगेशकरसोबत काम करू शकत नव्हता. कधी कधी तर लता मंगेशकर यांच्या तारखा जुळत नसत मग दिग्दर्शक या गायिकडे जायचे. आम्ही ज्या गायिकेबद्दल बोलत आहोत त्यांचे नाव सुमन कल्याणपूर असे आहे.
सुमन कल्याणपूर कधीही लता मंगेशकर यांच्या सावलीतून बाहेर पडू शकल्या नाहीत. आयुष्यभर त्यांची तुलना लता दीदींशी होत राहिली. अनेक गाणी अशी आहेत, जी आजही लोक लता मंगेशकर यांची समजतात, पण त्यामागील खरा आवाज सुमन कल्याणपूर यांचा आहे. आज आम्ही शम्मी कपूर आणि मुमताज यांच्या सुपरहिट गाण्याबद्दल चर्चा करणार आहोत.
शम्मी कपूर आणि मुमताज यांचे ते एव्हरग्रीन सुपरहिट गाणे जे त्या संपूर्ण काळाची ओळख बनले होते. ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबां पर’ हे गाणे ७० च्या दशकाची ओळख होते. हे गाणे चित्रपट ब्रह्मचारीचे आहे. यात शम्मी कपूर आणि मुमताज यांनी लीड रोल केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन भप्पी सोनी यांनी केले होते. चित्रपट ‘ब्रह्मचारी’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होता आणि त्याची गाणी देखील हिट ठरली होती.
शम्मी कपूर आणि मुमताज यांच्यावर चित्रित केलेले गीत ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे…’ सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांनी गायले होते. याचे संगीत शंकर जयकिशन यांनी दिले होते आणि बोल शैलेंद्र यांनी लिहिले होते. गाणे त्या काळात जबरदस्त लोकप्रिय झाले होते. चहाच्या टपरीपासून ते रेडिओपर्यंत सर्वत्र फक्त हेच गीत ऐकू येत होते.
हे गीत जरी सुमन कल्याणपूर यांनी गायले असले, तरी ते ऐकणाऱ्या बहुतेक लोकांना असे वाटत होते की या गाण्याला लता मंगेशकर यांचा आवाज आहे. हे एकमेव असे गाणे नव्हते. सुमन आणि लता यांचा आवाज इतका सारखा होता की अनेकदा लोक फसवत असत. सुमन कल्याणपूर यांनी आपल्या कारकिर्दीत ७४० गाण्यांना आवाज दिला. यापैकी बहुतेक गाणी त्यांनी मोहम्मद रफी यांच्यासोबत गायली होती.