Chiranjeevi: चित्रपटाचे मानधन घेण्यात अभिनेते चिरंजीवीनी अमिताभ बच्चन यांनाही टाकले होते मागे ; जाणून घ्या तो किस्सा
चिरंजीवी यांना देशातील तिसरा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार 'पद्मभूषण' देखील प्रदान करण्यात आला आहे. तसेच आंध्र विद्यापीठाने मानद डॉक्टरेटही दिली आहे.

दक्षिनात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांचा आज 67 वा वाढदिवस आहे. 1955 मध्ये जन्मलेल्या चिरंजीवीचे नाव अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्यांची लोकप्रियता केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्यांचे चाहते आहेत.

या अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीत एका पेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. पण अनेक कलाकारांनी राजकारणातही त्यांचे नशीब आजमावले आहे. चिरंजीवी यांनी 1978 मध्ये 'प्रणाम परचेस' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती, मात्र त्यांना 'माना पुरी पांडवुलु' या चित्रपटातून ओळख मिळाली.

1978 साली प्रदर्शित झालेल्या 'पुनाधिरल्लू' या चित्रपटातून चिरंजीवी आपल्या करिअरची सुरुवात करणार होते हे फार कमी लोकांना माहीत आहे. मात्र काही कारणास्तव हे होऊ शकले नाही. अभिनेता चिरंजीवी अल्पावधीतच तेलुगू चित्रपटसृष्टीचा एक चमकता तारा बनला. त्यानंतर या अभिनेत्याने हळूहळू कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले.

चिरंजीवीच्या करिअरमध्ये एक काळ असा होता. जेव्हा तो भारतातील सर्वात महागडा अभिनेता होता. त्यांची गणना भारतातील त्या अभिनेत्यांसोबत होते, ज्यांचे नाव आणि फी चर्चेत होती. 1992 मध्ये आलेल्या 'घराना मोगुडू' या चित्रपटापासून तो भारतातील सर्वात महागडा अभिनेता ठरला.

एकदा तर त्यांनी अमिताभ बच्चन यांनाही या प्रकरणात मागे टाकले होते. असा दावा केला जातो की, एकेकाळी चिरंजीवी एका चित्रपटासाठी दीड कोटी रुपये घेत असत आणि त्याचा वेळी अमिताभ बच्चन यांची फी एक कोटी रुपये होती.