सलमान खानच्या चित्रपटात गंभीर दुखापत, या अभिनेत्रीची 6 महिन्यांपर्यंत गेलेली स्मरणशक्ती, आजही काहीच आठवत नाही
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या एका चित्रपटासाठी या अभिनेत्रीने केलं असं काम, 6 महिने गेली होती स्मरणशक्ती. आजही तिला या काळातील एकही गोष्ट आठवत नाही.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिने तिच्या आयुष्यातील एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे. अभिनेता सलमान खानच्या 'भारत' या चित्रपटाच्या तयारीदरम्यान झालेल्या अपघातामुळे तिची तब्बल सहा महिन्यांची स्मरणशक्ती नष्ट झाली होती.

माध्यमांशी बोलताना दिशाने सांगितले की, ‘भारत’ चित्रपटासाठी जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण घेत असताना तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीचा परिणाम इतका गंभीर होता की ती त्या काळातील सहा महिन्यांच्या आठवणी पूर्णपणे विसरली. आजही त्या कालावधीतील कोणतीही घटना तिला आठवत नाही.

दिशा म्हणाली होती की, 'मी प्रयत्न केला तरी त्या काळातील काहीही आठवत नाही.' या अपघातानंतर तिला दीर्घ काळ उपचार आणि पुनर्वसन प्रक्रियेतून जावे लागले. 2022 मध्ये तिने सोशल मीडियावर तिच्या रिकव्हरीदरम्यानचा एक फोटोही शेअर केला होता. त्यामध्ये दुखापतींमधून सावरण्याचा संघर्ष तिने चाहत्यांसोबत शेअर केला होता.

अनेक अडचणींना सामोरे जाऊनही दिशाने धैर्याने पुनरागमन केले. आज ती फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीसाठी ओळखली जाते. अभिनय क्षेत्रातही ती सातत्याने सक्रिय असून कल्कि 2898 AD, कंगुवा, योद्धा आणि एक व्हिलन रिटर्न्स यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.

लवकरच दिशा वेलकम टू द जंगल आणि आवारापन 2 या चित्रपटांमध्ये झळकणार असून, तिच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचेही चित्रीकरण पूर्ण झाले आहे. स्मरणशक्ती गमावण्यासारख्या गंभीर प्रसंगावर मात करून तिने केलेले पुनरागमन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.