
ऐश्वर्या रायशी ब्रेकअप झाल्यानंतर सलमान खानच्या आयुष्यात कॅटरिना कैफ आली. पाच वर्ष दोघे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर ब्रेकअप झालं. कॅटरिनाने विकी कौशलशी लग्न केलं. सलमान अजूनही सिंगल आहे. पण आजही दोघांमध्ये मैत्रीचं चांगलं नातं आहे.

बॉलिवूडमधलं आणखी एक गाजलेलं प्रेम प्रकरण म्हणजे दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर. दोघे रिलेशनशिपमध्ये होते. पुढे त्यांचं ब्रेकअप झालं. रणबीरच्या आयुष्यात कॅटरिना आली. आज दीपकाच रणवीर सिंह सोबत लग्न झालय. पण आता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण परस्परांचे चांगले मित्र आहेत.

अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांचं लव्ह मॅरेज होते. लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली. पण लग्नानंतर काही वर्षांनी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज दोघांच्या आयुष्यात वेगवेगळा जोडीदार आहे. पण त्यांच्यातल्या मैत्रीचं नात कायम आहे.

90 च्या दशकात सलमान खानच्या आयुष्यात संगीता बिजलानी होती. ते सलमानच दुसरं प्रेम असल्याचं बोललं जाते. दोघे परस्परांना खूर सीरीयस होते. दोघे लग्न देखील करणार होते. पण त्यांचं ब्रेकअप झालं. संगीता बिजलानीने मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केलं. पण आजही सलमान आणि संगीता बिजलाने एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

23 नोव्हेंबर 2025 रोजी भारताची अव्वल क्रिकेटपटू स्मृती मानधनाने लग्नाच्या काही तास आधी पलाश मुच्छलसोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आज तिने लग्न रद्द झाल्याचं जाहीर केलं. त्याचवेळी पलाश मुच्छलला इन्स्टाग्रामवर अनफॉलो करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे स्मृतीला सध्या पलाश सोबत कुठलही नातं ठेवायचं नाही.