TMKOC: ‘दयाबेन’ नंतर आता ‘जेठालाल’ देखील घेणार मालिकेतून निरोप? अभिनेत्याकडून सत्य समोर

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा एक लोकप्रिय टेलिव्हिजन शो आहे. जेठालाल आणि बबिताजी हे प्रेक्षकांचे आवडते पात्र आहेत, ज्यांच्याबद्दल नेहमीच काही ना काही बातम्या येत असतात. दरम्यान, 'दयाबेन' नंतर आता 'जेठालाल' देखील घेणार मालिकेतून निरोप अशाा चर्चांनी जोर धरला यावर आता खुद्द दिलीप जोशी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

| Updated on: Aug 12, 2025 | 2:43 PM
1 / 5
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील जेठालाल म्हणजे दिलीप जोशी लवकरच मालिकेचा निरोप घेणार अशी चर्चा रंगली होती. यावर आता जेठालाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील जेठालाल म्हणजे दिलीप जोशी लवकरच मालिकेचा निरोप घेणार अशी चर्चा रंगली होती. यावर आता जेठालाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

2 / 5

नुकताच झालेल्या मुलाखतीत जेठालाल म्हणाले, 'मी मालिका सोडणार अशा अफवा कोण पसरवत आहे मला माहिती नाही. याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही.'

3 / 5

'अशी अफवा पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मी भारताबाहेर गेलो तेव्हा असंच म्हटलं गेलं होतं. जेव्हा जेव्हा मी एखाद्या भागात दिसत नाही तेव्हा अशी अफवा पसरत असते.'

4 / 5

'मला माहित नाही की हे सर्व करायला कोणाला आवडतं. पण जोपर्यंत तारक मेहता मालिका प्रसारित होत आहे तोपर्यंत मी मालिकेत काम करत राहीन.' असं देखील जेठालाल म्हणाले.

5 / 5

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या 17 वर्षांपासून मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us