भारतासाठी सर्वात मोठी खुशखबर, एकीकडे शस्त्रसंधी होताच भारताचा…जागतिक बँकेने काय सांगितलं?
भारतात पेट्रोल, डिझेलची टंचाई संपू शकते. तसेच वधरलेला भावही कमी होऊ शकतो. तसेच कच्च्या तेलाची कमतरताही संपू शकते. दुसरीकडे गॅस सिलिंडरचाही तुटवडा कमी होऊ शकतो. दरम्यान, एकीकडे ही शस्त्रसंधी झालेली असताना दुसरीकडे आणखी एक दिलासा देणारी खुशखबर मिळाली आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली आहे. या शस्त्रसंधीनंतर जगावरील उर्जासंकट टळले आहे. आता या दोन्ही देशांमध्ये युद्ध समाप्तीसाठी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चर्चा होणार आहे. ही शस्त्रसंधी झाल्याने भारताचाही अनेक पातळीवर फायदा होणार आहे.

भारतात पेट्रोल, डिझेलची टंचाई संपू शकते. तसेच वधरलेला भावही कमी होऊ शकतो. तसेच कच्च्या तेलाची कमतरताही संपू शकते. दुसरीकडे गॅस सिलिंडरचाही तुटवडा कमी होऊ शकतो. दरम्यान, एकीकडे ही शस्त्रसंधी झालेली असताना दुसरीकडे आणखी एक दिलासा देणारी खुशखबर मिळाली आहे.

इराण-अमेरिका यांच्यात शस्त्रसंधी होत असतानाच जागतिक बँकेने भारताच्या जीडीपीबाबत काही अंदाज लावले आहेत. अंदाजित जीडीपीचा हा आकडा पाहून भारत हा दक्षिण आशियाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे म्हटले जात आहे.

जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2026-27 साठी भारताचा जीडीपी 6.3 वरून 6.6 असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जागतिक बँकेने जारी केलेल्या साऊथ एशिया इकोनॉमिक अपडेट जारी केले आहे. यामध्येच भारताच्या जीडीपीविषयी हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भारताचा जीडीपी वाढण्याची शक्यता असली तरी दक्षिण आशियाचा एकूण जीडीपी 2026 साली घसरून 6.3 टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य आशियात सुरू असलेल्या युद्धामुळेच ही घसरण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.