Maharashtra News LIVE : मोशीतील दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू, बचावकार्य थांबवलं
Maharashtra live update : मोशीत घडलेल्या दुर्घनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आज बचावकार्य थांबवण्यात आले आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
ब्रेक घाटनांदुर येथे चाकूने वार करून 21 वर्षीय एकाचा खून रात्रीची घटना
अंबाजोगाई तालुक्यातील पट्टी वडगाव येथील ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे वय 21 वर्षे या युवकाच्या रात्री घाटनांदुर येथे साठे चौकात चाकूने वार करून खून करण्यात आला आहे. खुनाच कारण मात्र अजून समजू शकले नाही पोलिसांनी चार जणांना संशयत म्हणून ताब्यात घेतले आहे. मयताची बॉडी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय या ठिकाणी नेण्यात आली आहे
-
सिडकोच्या घराची प्रतीक्षा पडली लांबणीवर
अनेक जण सिडकोच्या घराच्या सोडतीच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु 4 महिन्यांपासून सिडकोची सोडत काढली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे पैसे मागील 4 महिन्यांपासून अडकले आहेत.
-
-
सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या ‘बूस्टर’ कंपनीविरोधात गुन्हा
सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या ‘बूस्टर’ कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोयाबीनचे 7 नमुने अप्रामानित ठरले आहे. तर 500 हून अधिक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर ही कारवाई झाली.
-
पुण्यात सदाशिव पेठेत दुकानाला लागली आग, दुर्घटनेत जीवितहानी नाही
पुण्यात सदाशिव पेठेत दुकानाला आग लागल्याची घटना घडली. आगीचे अद्याप कारण समजले नाही. पाच मजली इमारत असलेल्या भागात पहिला व दुसरा मजला दुकानाचा असल्याचे समजतेय. या दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर आयक्रॅलिक मशीन, कच्चे सामान, पीओपी, वायरिंग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
-
मोशी दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू, मध्यरात्री एकाचा मृतदेह सापडला, शोधकार्य थांबवलं
मोशी दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. एका व्यक्तीचा मृतदेह मध्यरात्री एक वाजता सापडला. बुधवारी दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू असलेलं बचावकार्य मध्यरात्री एक वाजता थांबवण्यात आलं. या ढिगाऱ्यात एकूण 23 जण अडकले होते.
-
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील मोशीत कचरा डेपोमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. काल मोशीत अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. मागील दोन दिवसांत राज्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. दुसरीकडे राज्यातील धरणक्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील दारणा, भावली, भाम, वाकी, वालदेवी धरणात पाणीसाठा वाढला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट जाणून घ्या.
Published On - Jul 12,2026 8:57 AM
