
आचार्य चाणक्य यांचं नीतीशास्त्र आजही तंतोतंत लागू होतं. त्यामुळे पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. चाणक्य यांच्या नीतिशास्त्राचं पालन केल्याने चंद्रगुप्त सम्राट झाला. अनेकदा जवळच्या व्यक्तींकडून विश्वासघात होतो. अशावेळी चाणक्य नीतीतील गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रानुसार एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत स्वार्थाशिवाय मैत्री करत नाही. लोभी व्यक्तीचा साथ कधीच कोणी देत नाही. त्यामुळे वाईट काळात असे लोक कायम एकटे राहतात. त्यांची कोणी मदत करत नाही. त्यामुळे लोभापासून कायम दूर राहिलं पाहीजे.

काही जण शिक्षित झाल्यानंतर स्वताला खूपच शहाणे समजतात आणि इतरांची तुलना मुर्खात करतात. चाणक्य नीतीनुसार मनुष्याने कधीच कुणाला कमकुवत समजू नये. कारण कमकुवत समजली जाणारी व्यक्तीने कदाचित आपली क्षमता दाखवली नसेल. त्यामुळे सावधपणे पावलं उचलणं महत्त्वाचं ठरतं.

चाणक्य नीतीत सांगितलं आहे की, व्यक्तीने आपल्या चुकांसोबत इतरांच्या चुकांमधूनही बोध घेतला पाहीजे. त्यामुळे भविष्यात मोठ्या चुका टाळता येतात. तसेच समाजात मानसन्मान वाढतो आणि यश मिळतं.

चाणक्य नीतीनुसार, खोटं बोलून मिळवलेली संपत्ती असो की यश जास्त काळ टिकत नाही. एका ठराविक कालावधीनंतर व्यक्ती रसातळाला जातो. त्यामुळे मेहनत करून मिळवलेलं सर्वात चांगलं असतं. त्यामुळे मेहनतीने मिळवलेल्या यशात फसवणूक झाली तरी त्यातून लवकर सावरता येते.