
आशिया कपमध्ये सर्वात यशस्वी संघ कुठला असं विचारलं, तर पटकन टीम इंडियाच नाव घ्याल. पण यशस्वी संघालाही धोका असतो. आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाला तो एकमेव धोका आहे. (Photo: BCCI)

आशिया कप टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाला तो एकमेव धोका श्रीलंकन संघाचा आहे. आशिया कप टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाला आतापर्यंत 11 वेळा श्रीलंकन टीमनेच धक्का दिला आहे. म्हणजे हरवलं आहे. (Photo: BCCI)

भारत आणि श्रीलंकेची टीम आशिया कपच्या इतिहासात आतापर्यंत 23 वेळा आमने-सामने आली आहे. यात 12 वेळा भारत जिंकलाय. श्रीलंकेने 11 वेळा बाजी मारलीय. म्हणजे तगडा मुकाबला आहे. म्हणून टीम इंडियाला श्रीलंकेपासूनच धोका आहे. (Photo: BCCI)

आशिया कपमध्ये टीम इंडियाला अन्य दुसऱ्या कुठल्या टीमकडून तितका धोका नाहीय. बांग्लादेश विरुद्ध 13 सामने जिंकलेत. यात दोन पराभव आहेत. पाकिस्तान विरुद्ध 10 विजय आणि 6 पराभव आहेत. (Photo: BCCI)

यावेळी आशिया कपमध्ये 8 संघ आहेत. पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश सोडून अन्य कुठलाही संघ भारताविरुद्ध आशिया कपमध्ये विजय मिळवू शकलेला नाहीय. (Photo: BCCI)