बोरीवली पासून फक्त काही तासांच्या अंतरावर आहे सर्वात शांत आणि सुंदर ठिकाण, नजारा पाहून व्हाल चकित
बोरीवली पासून फक्त काही तासांच्या अंतरावर आहे सर्वात शांत आणि सुंदर हिल स्टेशन. जेथील सौंदर्य आणि धबधबे पाहून परत येण्याची होत नाही इच्छा.

महाराष्ट्रात फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत पण त्याचबरोबर काही कमी परिचित आणि तितकीच सुंदर ठिकाणेही आहेत.

अशाच ठिकाणांपैकी एक म्हणजे माळशेज घाट. बोरीवली पासून सुमारे 150-152 किमी अंतरावर वसलेले हे हिल स्टेशन निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.

मालशेज घाट हा अजूनही मोठ्या पर्यटन गर्दीपासून काहीसा दूर असल्यामुळे येथे शांतता अनुभवायला मिळते.

डोंगररांगा, धबधबे, धुक्याची चादर आणि हिरवागार निसर्ग यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला एक वेगळाच अनुभव मिळतो.

हिवाळ्यात आणि पावसाळ्यात येथील नजारे अत्यंत मनमोहक असतात. ढगांनी वेढलेले डोंगर आणि वाऱ्याची गार झुळूक पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकते.

मालशेज घाट हे ठिकाण बोरवलीपासून सुमारे 151 किमी अंतरावर आहे. येथे तुम्ही खासगी कार, बाईक, बस, रेल्वेने जवळच्या स्थानकापर्यंत जाऊन पुढे रस्त्याने प्रवास करून पोहचू शकता.