या 3 प्रकारच्या लोकांना मदत करणे ठरू शकते घातक; आचार्य चाणक्यांनी दिला महत्त्वाचा सल्ला
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी कोणत्या तीन लोकांना मदत करायची नाही याबद्दल देखील सांगितलं आहे.

भारतीय संस्कृतीत परोपकाराला सर्वोच्च धर्म मानले जाते. गरजूंची मदत करणे हे माणसाचे मोठे कर्तव्य समजले जाते. मात्र, आचार्य चाणक्य यांच्या मते प्रत्येकालाच विचार न करता मदत करणे योग्य नसते. काही व्यक्तींना केलेली मदत ही पुण्याऐवजी स्वतःसाठी अडचणी, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रासाचे कारण ठरू शकते.

चाणक्य यांच्या मते मूर्ख व्यक्तीला कितीही समजावले किंवा मदत केली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. अशी व्यक्ती सत्य स्वीकारण्यास तयार नसते आणि स्वतःच्या अज्ञानातच आनंद मानते.

दुष्ट आणि स्वार्थी स्वभावाच्या व्यक्तींना मदत करणेही धोकादायक ठरू शकते. अशा लोकांचा स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर ते मदत करणाऱ्यालाच अडचणीत आणू शकतात.

याशिवाय अनैतिक कृत्ये करणारे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा व्यसनाधीन लोक यांना मदत करणे म्हणजे त्यांच्या चुकीच्या वर्तनाला अप्रत्यक्षपणे पाठबळ देण्यासारखे असल्याचे चाणक्य सांगतात.

मदतीची जाणीव न ठेवणाऱ्या व्यक्तींपासून देखील सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अशी माणसे मदत मिळाल्यानंतर ती सहज विसरतात आणि गरज पडल्यास मदत करणाऱ्यालाच धोका देऊ शकतात.

आचार्य चाणक्य यांच्या मते, मदत करणे हा निश्चितच मोठा गुण आहे; मात्र ती योग्य व्यक्तीला, योग्य हेतूने आणि योग्य वेळीच करावी. अन्यथा त्याचे दुष्परिणाम स्वतःलाच भोगावे लागू शकतात.