
भारताचा शेवटचा रस्ता दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात आहे. धनुषकोडी नावाच्या ठिकाणी हा रस्ता आहे. इथे या रस्त्याचा अंत होतो आणि समुद्राला सुरुवात होते.

रस्त्याने जाता येणारे हे भारतातील शेवटचे ठिकाण आहे. येथून समुद्र सुरू होतो आणि या ठिकाणापासून श्रीलंका फक्त 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे.

तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्याच्या आग्नेय किनाऱ्यावर धनुषकोडी नावाचे शहर आहे. या ठिकाणी भारतातील शेवटच्या रस्त्याचा अंत होतो आणि त्यानंतर पाल्क सामुद्रधुनी सुरू होते.

रामायणात धनुषकोडी शहराचा उल्लेख करण्यात आला होता. असे मानले जाते की भगवान श्री राम लंकेला जाण्यासाठी निघाले तेव्हा या ठिकाणापासून रामसेतूचे बांधकाम सुरू केले होते.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 87 हा रामेश्वरम आणि धनुषकोडीला जोडतो. हा महामार्ग हिंदी महासागर बंगालच्या उपसागराच्या सीनेवर आहे. या ठिकाणाला अनेक पर्यटक भेट देत असतात.