Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव

Dia Mirza: बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा सध्या तिचा सिनेमा ‘ऑपरेशन सफेद सागर’मुळे चांगलीच चर्चेत आहे. तिने या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

| Updated on: Aug 25, 2026 | 8:43 AM
1 / 6
२००१ च्या ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर दिया मिर्झाने अनेक चित्रपटांत काम केले आहे. तिचा नुकताच नेटफ्लिक्सवर ‘ऑपरेशन सफेद सागर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिया मिर्झाने आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

२००१ च्या ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर दिया मिर्झाने अनेक चित्रपटांत काम केले आहे. तिचा नुकताच नेटफ्लिक्सवर ‘ऑपरेशन सफेद सागर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिया मिर्झाने आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

2 / 6

Zoom स्पॉटलाइट सेशन्समधील एका मुलाखतीदरम्यान दियाने सांगितले की, २००४ च्या ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटात काम करताना तिला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या. तिला आपल्या शरीराबाबत सुरक्षित, आरामदायक आणि शक्तिशाली वाटू लागले होते.

3 / 6

अभिनेत्री दिया मिर्झाने सांगितले की, ‘मला ते गाणे आठवते जे वैभवी मर्चंट यांनी आमच्यासोबत शूट केले होते आणि मी निर्मात्यांना फक्त हेच सांगितले होते. हे असे गाणे होते ज्यात मला कपडे काढायचे होते आणि मला फक्त ब्रा आणि अंडरवेअर घालावे लागले होते.’

4 / 6

शूटिंगविषयी बोलताना दिया म्हणाली की, ‘सेटवर ५०० लोकांची गर्दी होती. त्यातले अर्धेव पुरुष होते आणि २०० लोकांचा क्रू होता ज्यातही बहुतेक पुरुष होते आणि या गाण्यातून मला जे मिळाले ते कदाचित माझ्या इतर कोणत्याही चित्रपटातून मिळाले नसते. मला जाणवले की मी पुरुषांच्या नजरेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करु लागले आणि बेफिकीर राहू शकते. माझ्या स्त्री शक्तीचा तसेच माझ्या सौंदर्याचा आनंद घेऊ लागले आणि मला कन्फर्टेबल राहायचं होतं.’

5 / 6

दियाच्या मते हा संपूर्ण अनुभव ‘एम्पावरिंग’ होता. ती पुढे म्हणाली, ‘हे भट्ट साहेब, अनुराग आणि इमरान तसेच तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने मला जाणवून दिले की हे नेहमी त्याबद्दल नसते, तर त्यापेक्षा खूप काही जास्त असते.’

6 / 6

याशिवाय या मुलाखतीत दियाने मान्य केले की स्वतःच्या चेहऱ्याबाबत आणि सौंदर्याबाबत गरजेपेक्षा जास्त विचार करणे माणसाच्या मनावर परिणाम करू शकते. ती म्हणाली, ‘सुंदर दिसण्याच्या इच्छेची एक किंमत असते. त्याची किंमत म्हणजे तुमच्या मनाची शांतता आणि मी त्यात मला अडकायचे नाही.’

Follow Us