दूरदर्शनवरील या मालिकेच्या सेटवर झालेला 60 जणांचा मृत्यू, मुख्य अभिनेत्याच्या झालेल्या 72 सर्जरी

दूरदर्शनवरील प्रचंड दमदार कथा असणारी मालिका, ज्यामधील 60 लोकांचा झाला होता आगीमुळे मृत्यू. मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्याला कराव्या लागल्या होत्या 72 सर्जरी.

| Updated on: Aug 08, 2026 | 3:28 PM
1 / 5
दूरदर्शनवरील अनेक जुन्या मालिका आजही त्यांच्या दमदार कथानकासाठी आणि भव्य निर्मितीसाठी प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुलतान’. मात्र, या मालिकेची आठवण एका भीषण दुर्घटनेमुळेही केली जाते.

दूरदर्शनवरील अनेक जुन्या मालिका आजही त्यांच्या दमदार कथानकासाठी आणि भव्य निर्मितीसाठी प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुलतान’. मात्र, या मालिकेची आठवण एका भीषण दुर्घटनेमुळेही केली जाते.

2 / 5
8 फेब्रुवारी 1989 रोजी म्हैसूर येथील प्रीमियर स्टुडिओमध्ये मालिकेच्या शूटिंगदरम्यान लागलेल्या आगीत सुमारे 60 हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मालिकेचे शूटिंग भव्य सेटवर सुरू होते. अचानक सेटवर आग लागली आणि काही क्षणांतच आगीने संपूर्ण स्टुडिओला वेढले.

8 फेब्रुवारी 1989 रोजी म्हैसूर येथील प्रीमियर स्टुडिओमध्ये मालिकेच्या शूटिंगदरम्यान लागलेल्या आगीत सुमारे 60 हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मालिकेचे शूटिंग भव्य सेटवर सुरू होते. अचानक सेटवर आग लागली आणि काही क्षणांतच आगीने संपूर्ण स्टुडिओला वेढले.

3 / 5
मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ अडकले. आगीमुळे मोठी जीवितहानी झाली आणि त्यानंतर मालिकेचे चित्रीकरण काही काळासाठी थांबवण्यात आले.

मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ अडकले. आगीमुळे मोठी जीवितहानी झाली आणि त्यानंतर मालिकेचे चित्रीकरण काही काळासाठी थांबवण्यात आले.

4 / 5
या दुर्घटनेत मालिकेचे प्रमुख अभिनेते संजय खान हे देखील गंभीर जखमी झाले. त्यांच्या चेहऱ्यासह शरीराचा मोठा भाग आगीत भाजला होता. त्यांना दीर्घकाळ रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. जवळपास सहा महिने ते रुग्णालयात होते आणि त्यांच्या उपचारादरम्यान अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

या दुर्घटनेत मालिकेचे प्रमुख अभिनेते संजय खान हे देखील गंभीर जखमी झाले. त्यांच्या चेहऱ्यासह शरीराचा मोठा भाग आगीत भाजला होता. त्यांना दीर्घकाळ रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. जवळपास सहा महिने ते रुग्णालयात होते आणि त्यांच्या उपचारादरम्यान अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

5 / 5
या दुर्घटनेनंतर चित्रपट आणि दूरदर्शनच्या शूटिंग सेटवरील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर शूटिंगदरम्यान अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन उपाययोजनांकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाऊ लागले. भारतीय दूरदर्शनच्या इतिहासातील ही सर्वात भीषण दुर्घटनांपैकी एक मानली जाते.

या दुर्घटनेनंतर चित्रपट आणि दूरदर्शनच्या शूटिंग सेटवरील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर शूटिंगदरम्यान अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन उपाययोजनांकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाऊ लागले. भारतीय दूरदर्शनच्या इतिहासातील ही सर्वात भीषण दुर्घटनांपैकी एक मानली जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us