थंडीत प्या कारल्याचा रस, त्वचा आणि डोळ्यांसाठी ठरतो फायदेशीर

| Updated on: Dec 12, 2022 | 10:03 AM
1 / 5
कारलं ही अशी भाजी आहे, ज्याचं नाव ऐकताच अनेक लोकांच्या तोंडाची चवच निघून जाते, त्याच कारण म्हणजे कारल्याची कडवी चव. पण थंडीच्या दिवसात कारल्याचा रस पिणे खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात आपण तब्येतीची काळजी घेत आजारांपासून बचाव केला पाहिजे. त्यामुळेच या दिवसात खाण्या-पिण्याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे.

कारलं ही अशी भाजी आहे, ज्याचं नाव ऐकताच अनेक लोकांच्या तोंडाची चवच निघून जाते, त्याच कारण म्हणजे कारल्याची कडवी चव. पण थंडीच्या दिवसात कारल्याचा रस पिणे खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात आपण तब्येतीची काळजी घेत आजारांपासून बचाव केला पाहिजे. त्यामुळेच या दिवसात खाण्या-पिण्याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे.

2 / 5
कारल्याचं नाव ऐकताच बरेच लोक तोंड वेंगाडतात. लोकांना त्याची कडवट चव फारशी आवडतही नाही. पण हेच कारलं थंडीच्या दिवसात होणाऱ्या आजारांशी लढण्यात उपयुक्त ठरतं हे तुम्हाला माहीत आहे का ? हिवाळ्यात कारल्याचे सेवन केले किंवा त्याचा ज्यूस प्यायल्याने अनेक फायदे मिळतात.

कारल्याचं नाव ऐकताच बरेच लोक तोंड वेंगाडतात. लोकांना त्याची कडवट चव फारशी आवडतही नाही. पण हेच कारलं थंडीच्या दिवसात होणाऱ्या आजारांशी लढण्यात उपयुक्त ठरतं हे तुम्हाला माहीत आहे का ? हिवाळ्यात कारल्याचे सेवन केले किंवा त्याचा ज्यूस प्यायल्याने अनेक फायदे मिळतात.

3 / 5
कारल्याचा हा ज्यूस बनवण्यासाठी फार मेहनतही कराली लागत नाही. घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या पदार्थांच्या मदतीने हा ज्यूस झटपट बनू शकतो. त्यासाठी कारलं स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात कारल्याचे तुकडे, थोडंस आलं, काळी मिरी, हळद आणि चवीनुसार मीठ आणि पाणी घालून त्याचा ज्यूस तयार करावा.

कारल्याचा हा ज्यूस बनवण्यासाठी फार मेहनतही कराली लागत नाही. घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या पदार्थांच्या मदतीने हा ज्यूस झटपट बनू शकतो. त्यासाठी कारलं स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात कारल्याचे तुकडे, थोडंस आलं, काळी मिरी, हळद आणि चवीनुसार मीठ आणि पाणी घालून त्याचा ज्यूस तयार करावा.

4 / 5
तुम्ही सकाळी अंशपोटी किंवा उपाशीपोटी कारल्याचा रस प्यायलात तर शरीरातील विषरी पदार्थ अथवा टॉक्सिनस बाहेर पडायला मदत होते. तसेच पोटही व्यवस्थित साफ होते.

तुम्ही सकाळी अंशपोटी किंवा उपाशीपोटी कारल्याचा रस प्यायलात तर शरीरातील विषरी पदार्थ अथवा टॉक्सिनस बाहेर पडायला मदत होते. तसेच पोटही व्यवस्थित साफ होते.

5 / 5
कारल्याचा ज्यूस प्यायल्याने रक्त शुद्ध होते, त्यामुळे त्वचेसंदर्भात कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

कारल्याचा ज्यूस प्यायल्याने रक्त शुद्ध होते, त्यामुळे त्वचेसंदर्भात कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

Follow Us