
बरेच लोक सकाळी झोपेतून उठले की, उपाशी पोटी गरम पाण्यात मध टाकून पितात. यामुळे अनेक आरोग्य फायदे होतात, असे सांगितले जाते. ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

नुकताच एक धक्कादायक रिपोर्ट आला असून गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यात मध्य मिक्स करून पिणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.

आयुर्वेदानुसार आपली ही सवय अत्यंत घातक आहे. यामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या देखील निर्माण होऊ शकतात. तुम्ही जरी असेल करत असाल तर सावधान व्हा.

आयुर्वेदानुसार, गरम गोष्टींमध्ये मध मिक्स करून पिणे योग्य अजिबातच नाही, आपण असे करणे कायमच टाळावे. ज्याचा परिणाम थेट आरोग्यावर होऊ शकतो.

काही लोक गरम पाण्यात मध्यच नाही तर लिंबूही मिक्स करून एकाच वेळी पितात. काहींचे म्हणणे आहे की, यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.